Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2022 HD Images: राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त  Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करुन थोर समाजसुधारकाला करा विनम्र अभिवादन
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2022 HD Image (PC - File Images)

महाराष्ट्रातील समाजिक समता आणि आधुनिक विचारांना चालना देणारे समाजसुधारक आणि कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2022 HD Images) यांची आज पुण्यतिथी. 26 जून 1874 रोजी जन्मलेल्या शाहू महाराज यांचे 6 मे 1922 मध्ये निधन झाले. महाराजांना जेवढे आयुष्य लाभले त्या आयुष्यात त्यांनी उत्कृष्ट राज्यकारभार कसा असावा हे दाखवून दिले. त्यांचे बालपणीचे नाव यशवंत राव होते. महत्त्वाचे म्हणजे राजे असूनही राजर्शी शाहू महाराज यांना दीन, दलित, दबळे यांच्याबद्दल प्रचंड जिव्हाळा होता. त्यातूनच त्यांनी जमाजसुधारणेची कास धरली. ते विद्वान तर होतेच परंतू समाजसुधारकही होते. छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करून लोकराजाला आपण अभिवादन करु शकता.

छत्रपती शाहू महाराज यांनी दलित आणि शोषित वर्गाचे दु: ख समजून घेत असे. दलित वर्गाच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली. त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे स्थापन केली. शाहू महाराजांच्या कारकीर्दीत 'बालविवाह' वर घालण्यात आली होती. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केले. (वाचा - Shahu Maharaj Birth Anniversary: समाजसुधारक आणि कोल्हापूरच्या भोसले घराण्याचे राजा शाहू महाराज यांच्याबद्दलची 'हे' मनोरंजक तथ्य जाणून घ्या)

Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2022 HD Image (PC - File Images)

 

Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2022 HD Image (PC - File Images)

 

Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2022 HD Image (PC - File Images)

 

Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2022 HD Image (PC - File Images)

 

Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2022 HD Image (PC - File Images)

छत्रपती शाहू महाराज यांचे बालपणीचे नाव यशवंतराव होते. शाहूजी महाराज यांचे 10 मे 1922 रोजी मुंबईत निधन झाले. महाराजाने पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली होती. दलितांच्या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी दोन खास प्रथा संपवल्या. त्यामुळे ते युगपुरुष असल्याचे सिद्ध झाले. त्यांनी 1917 मध्ये अस्पृश्यांना जमीन देऊन 'बलुतेदारी-प्रथा' संपविली. त्याचप्रमाणे 1918 मध्ये त्यांनी राज्यातील आणखी एक जुनी प्रथा ‘वतनदारी’ संपविण्याचा कायदा केला आणि जमीन सुधारणा धोरण राबवून महारांना जमीन मालक होण्याचा अधिकार दिला.