Eid Ul Adha 2022 Wishes, Images: बकरी ईद निमित्त खास शुभेच्छा संदेश, सोशल मीडियावर शेअर करत साजरा करा  ईद-उल-अजहा सणाचा उत्साह
Bakri-Eid-Wishes (File Image)

बकरी ईद म्हणजेच ईद-उल-अजहा (Eid al-Adha 2022) सण इस्लामिक कॅलेंडरनुसार वर्षाच्या 12 म्हणजे शेवटच्या महिन्यात पार पडतो. इस्लाम धर्म मानणाऱ्या नागरिकांसाठी हा वर्षातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाच सण आहे. याला जगभरात इसे ईद-उल-अजहा (Eid al-Adha) म्हणून ओळखले जाते. यंदाच्या वर्षी हा सण 10 जुलै (रविवार) रोजी आला आहे. आपले मित्र, सहकारी, नातेवाईक आणि आप्तेष्टांना ईद-उल-अजहा या सणानिमित्त आपण शुभेच्छा (Eid Ul Adha Mubarak) देऊ शकता. त्यासाठी खास Wishes, WhatsApp Status, Messages, Greetings शुभेच्छा संदेश (Bakrid Mubarak) इथे आपण पाहू शकता. ते आपण मोफत डाऊनलोडही करु शकता. बकरी ईदनिमित्त खास शुभेच्छा संदेश.

दूर व्हावे तुमचे दु:ख, दारिद्र, चुक-भूल

आपले नशीब इतके प्रकाशमान होवो की,

प्रार्थना करताच आपल्या इच्छा पूर्ण होवो

सातत्याने हसत रहावीत फुलं..

दूर व्हावे तुमचे दु:ख, दारिद्र, चुक-भूल

सर्वत्र गायले जावे आनंदाचे, समाधानाचे गीत..

सर्व प्रकारच्या शुभेच्छांसह आनंदी व्हावी आपली बकरी ईद..

(हेही वाचा, New Mehndi Designs For Eid al-Adha 2022: बकरीद किंवा ईद अल-अधानिमित्त घेऊन आलो आहोत, आकर्षक मेहंदी डिझाईन, पाहा व्हिडीओ)

सुख, आनंद, प्रेमाचा ऋतू आला

हवेला सुगंधाची साथ

सुंगदाला हवेची साथ

सुख, आनंद, प्रेमाचा ऋतू आला

आपल्याला बकरी ईद मुबारक

घेतला निर्णय बकरी ईद मुबारक म्हणण्याचा

विचार केला आपल्यासोबत संवाद करु

आपल्या जवळच्या कोणाचे स्मरण करु

घेतला निर्णय बकरी ईद मुबारक म्हणण्याचा

हृदयातून आवाज आला सुरुवात आपल्यापासून करण्याचा

जर मला मेसेज नाही केला तर..

खुदा करो आपल्याला दुरावा ना मिळो

कधीच आपल्याला व्याकूळता ना मिळो

जर मला मेसेज नाही केला तर..

असे काही घडावे की कुर्बानीवेळी आपल्याला कसाई ना मिळो

बकरी ईदच्या शुभेच्छा..!

बकरी ईद निमित्त या सदिच्छा..!

बकरी ईदच्या आपणा शुभेच्छा

जे आपल्याला हवे आहेत

त्यांनाही आपणच हवे व्हावेत

बकरी ईद निमित्त या सदिच्छा..!

दरम्यान, भारतात 2022 मध्ये 10 जुलै रोजी साजरी होत आहे. ईद उल अजाहा इस्लामी कॅलेंडरचा 12 वा आणि शेवटचा महिना असतो. या दिवशी आनंद साजरा करण्यसाठी आणि गरिबांना, दीनदुबळ्यांना मदत केली जाते. कुर्बानीचे प्रसाद नागरिकांना दिला जातो. ज्या लोकांना एकवेळचे अन्नही मिळत नाही. अशा लोकांना दानधर्म केला जातो. नमाज अदा करण्यापूर्वी बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. त्यानंतर कुटुंबातील सदस्य, शेजारी ते गरिबांसोबत भक्षणही करतात.