Population Control Bill: 'भारतात एका मिनिटात 30 मुले जन्माला येतात, लोकसंख्या नियंत्रण विधेयक आवश्यक'- केंद्रीय मंत्री Giriraj Singh यांचे मोठे वक्तव्य

संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे की, भारत पुढील वर्षात जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून चीनला मागे टाकू शकतो. मात्र, वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स-2022 ने भारताच्या एकूण जनन दरात लक्षणीय घट झाल्याचेही ठळकपणे नमूद केले आहे.

Population Control Bill: 'भारतात एका मिनिटात 30 मुले जन्माला येतात, लोकसंख्या नियंत्रण विधेयक आवश्यक'- केंद्रीय मंत्री Giriraj Singh यांचे मोठे वक्तव्य
गिरिराज सिंह (फोटो सौजन्य-ट्वीटर)

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांनी रविवारी मोठे वक्तव्य केले आहे. गिरीराज सिंह म्हणाले की, लोकसंख्या नियंत्रण विधेयक (Population Control Bill) लागू करण्याची गरज आहे. हे कोणत्याही धर्मावर किंवा समाजातील कोणत्याही घटकावर लक्ष केंद्रित करणार नाही, तर ते संपूर्ण देशाच्या भल्यासाठी आहे. मर्यादित साधनांचा हवाला देत ते म्हणाले की, भारतात दर मिनिटाला तीस मुले जन्माला येत आहेत.

गिरीराज सिंह म्हणाले, ‘लोकसंख्या नियंत्रण विधेयक महत्त्वाचे आहे कारण आपल्याकडे मर्यादित संसाधने आहेत. चीनने लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'वन चाइल्ड पॉलिसी' लागू आणि विकसित केली. चीनमध्ये दर मिनिटाला दहा मुले जन्माला येतात आणि भारतात दर मिनिटाला तीस मुले जन्माला येतात.’

ते म्हणाले, ‘त्या देशाचा (चीन) जीडीपी 1978 मध्ये भारतापेक्षा कमी होता. त्या देशाने 'वन चाइल्ड पॉलिसी' स्वीकारली आणि सुमारे साठ कोटी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवून ते विकसित केले, असे अहवालात म्हटले आहे. भारतातही असे बिल येणे गरजेचे आहे. हे विधेयक कोणत्याही धर्माची पर्वा न करता सर्वांना लागू केले पाहिजे.’ या कायद्याचे पालन न करणाऱ्यांना कोणतेही शासकीय लाभ देऊ नये, तसेच त्यांचा मतदानाचा हक्कही हिरावून घेतला पाहिजे असेही ते म्हणाले. (हेही वाचा: मुंबई २६/११ च्या दहशतवादी हल्लेखोरांना शिक्षा झालीचं पाहिजे, न्याय करण्यासाठी भारत सरकार कटीबध्द: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर)

दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे की, भारत पुढील वर्षात जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून चीनला मागे टाकू शकतो. मात्र, वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स-2022 ने भारताच्या एकूण जनन दरात लक्षणीय घट झाल्याचेही ठळकपणे नमूद केले आहे. 1950 मध्ये प्रति महिलेने 5.9 मुलांना जन्म दिला होता, जो 2020 मध्ये प्रति महिला 2.2 झाला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2022 09:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).