Airtel कंपनीकडून ग्राहकांना झटका, टॅरिफ प्लॅनच्या दरात पुन्हा वाढ
नवं वर्षाच्या पहिल्याच दिवशी एअरटेल कंपनीने त्यांच्या ग्राहकांना झटका दिला आहे. कारण डिसेंबर महिन्यात कंपनीने त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या दरात बदल केल्यानंतर आता पुन्हा दर वाढवले आहेत. त्यामुळे एअरटेल ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे.
नवं वर्षाच्या पहिल्याच दिवशी एअरटेल कंपनीने त्यांच्या ग्राहकांना झटका दिला आहे. कारण डिसेंबर महिन्यात कंपनीने त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या दरात बदल केल्यानंतर आता पुन्हा दर वाढवले आहेत. त्यामुळे एअरटेल ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे. आजपासून प्लॅनचे नवे दर लागू होणार आहेत. एवढेच नाही तर तुम्हाला एअरेट कंपनीसोबत तुमचे मोबाईल कनेक्शन सुरु ठेवण्यासाठी ग्राहकांना 45 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. तर या प्लॅनची वॅलिडिटी 28 दिवसांची असणार आहे. यापूर्वी हा प्लॅन 35 रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आला होता.
एअरटेल ग्राहकांना कॉलिंगसाठी प्रति मिनिटांसाठी 1.40 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच SMS च्या दरात सुद्धा वाढ करण्यात आली आहे. एसएमएससाठी ग्राहकाला आता 1 रुपयांऐवजी 1.5 रुपये द्यावे लागणार आहेत. तर डिसेंबर महिन्यात कंपनीने त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ केली होती.(Reliance Jio, एअरटेल, वोडाफोन कंपन्यांचे प्रत्येक महिन्यासाठी 84GB पर्यंत डेटा असणारे बेस्ट प्लॅन जाणून घ्या)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 2020 04:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

