
भारतीय संघ (Indian Team) आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय मालिकेच्या सुरुवातीपूर्वी विराट कोहलीच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) दरम्यान 17 डिसेंबरपासून चार कसोटीची बॉर्डर-गावस्कर मालिका (Border-Gavaskar Trophy) खेळवण्यात येणार आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रानुसार सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) हे दोघेही कसोटी मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये भाग घेणार नाहीत. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) दरम्यान टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी निवड झाली होती. त्यावेळी रोहित हॅमस्ट्रिंग दुखापतीतून झगडत होता, त्यामुळे त्याला वनडे, टी-20 आणि कसोटी संघात स्थान देण्यात आले नव्हते. मात्र, नंतर त्याला कसोटी संघात सामील करण्यात आले तर मर्यादित ओव्हरच्या मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आली. (IND vs AUS 2020-21: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट मालिकेत रोहित-इशांतच्या खेळण्यावर संभ्रमाचं वातावरण; रवि शास्त्री यांच्या ट्विटनंतर श्रेयस अय्यरच्या नावाला उधाण)
बीसीसीआयच्या सूत्राने ESPNCricinfo ला सांगितले की, "टी-20 क्रिकेट बद्दल जर फक्त चार ओव्हर फेकले जायचे असेल तर इशांत तंदुरुस्त आहे आणि तो त्वरित ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकतो. परंतु संपूर्ण गोलंदाजीसाठी अजून चार आठवडे लागतील." दोघेही फिटनेसमध्ये पूर्णपणे व्यस्त आहेत. पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली पितृत्व रजेवर असेल आणि मायदेशी परतणार असेल. अशा परिस्थितीत रोहित टीममध्ये सामील झाला नाही तर संघासाठी हा मोठा धक्का ठरणार आहे. रोहितच्या जागी श्रेयस अय्यरचा संघात समावेश होऊ शकतो अशा चर्चा सध्या जोर धरत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाल्यावर 14 दिवस क्वारंटाइन राहणे अनिवार्य आहे. याचा अर्थ असा की तो दोन आठवड्यांनंतरच प्रशिक्षण सुरू करू शकतो. यानंतर, जर त्यांनी चार आठवड्यांचा प्रशिक्षण जोडला तर ते तिसर्या कसोटीसाठी सज्ज होऊ शकतात, जे पुढच्या वर्षी 7 जानेवारीपासून सिडनी येथे खेळली जाणार आहे.
इशांत आणि रोहित यांना आयपीएल दरम्यान दुखापत झाली होती. इशांत सुरुवातीला फक्त एकच सामना खेळू शकला, ज्यानंतर तो फिटनेस मालवण्यासाठी मायदेशी परतला. दुसरीकडे, रोहित हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सकडून काही सामने खेळू शकला नाही, पण त्यानंतर त्याने मैदानावर पुनरागमन केले आणि ज्यामुळे त्याला अखेरीस कसोटी संघात देण्यात आली. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाली असताना रोहित बेंगलोरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ट्रेनिंगसाठी परतला.