Virat Kohli Captaincy Controversy: कोहलीच्या वक्तव्यावर चेतन शर्मा यांचे स्पष्टीकरण, T-20 कर्णधारपद सोडायला सांगितलं नव्हतं
'विराट कोहलीने टी-20 विश्वचषकापूर्वी टी-20चे कर्णधारपद सोडण्याबाबत सांगितले. आम्ही सर्वांनी त्याला या निर्णयावर विचार करण्यास सांगितले. त्यावेळी संघ मोठ्या स्पर्धेत उतरणार होता.
विराट कोहलीसाठी (Virat Kohli) नवीन वर्ष वादाचे कारण ठरू शकते. नुकतीच त्याच्याकडून एकदिवसीय संघाची कमान परत घेण्यात आली. त्यानंतर बीसीसीआयने (BCCI) दीड तासापूर्वीच याबाबत कळवले होते, असे विराट कोहली म्हणाला. यापूर्वी बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguli) म्हणाले होते की, मी कोहलीला T20 चे कर्णधारपद सोडू नका, अन्यथा एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही त्याच्याकडून परत घेतले जाईल असे सांगितले होते. मात्र कोहलीने या गोष्टींचा नकार केला. परंतु मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनीही गांगुलीच्या शब्दांना पुढे केले की सर्वांनी त्याला T20 चे कर्णधारपद न सोडण्याची विनंती केली होती. प्रसारमाध्यमांशी बोलताना चेतन शर्मा म्हणाले, 'विराट कोहलीने टी-20 विश्वचषकापूर्वी टी-20चे कर्णधारपद सोडण्याबाबत सांगितले. आम्ही सर्वांनी त्याला या निर्णयावर विचार करण्यास सांगितले. त्यावेळी संघ मोठ्या स्पर्धेत उतरणार होता.
चेतन शर्मा म्हणाले की, विराट कोहलीसोबत आमची चांगली चर्चा झाली. त्यानंतर फक्त कसोटी संघ निवडायचा होता. मी स्वतः त्याला फोन केला होता. पण असे वाद होणे चांगले नाही. आम्ही त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवण्याबाबत कळवले होते. कोहली हा संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. हा वाद आता नव्या वर्षाने संपला पाहिजे, असे ते म्हणाले. (हे ही वाचा IND vs SA: भारताचा वनडे संघ जाहीर, रोहित शर्मा बाहेर, केएल राहुल कर्णधार.)
कोहली आणि रोहितमध्ये चांगले संबंध
भारताचा माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा म्हणाले की, रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांमध्ये कोणतीही अडचण नाही. त्यांच्यातील वादाचे किस्से ऐकून आम्ही हसतो. ते पुढे म्हणाले की, आमचे काम चांगले संघ निवडणे आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारचा वाद नको आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 31, 2021 11:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

