एक दिशाभूल करणाऱ्या ट्विटमध्ये दावा करण्यात आला आहे की, युएई 4 महिन्यांपर्यंत भारताकडून गहू मागवणार नाही. या ट्वीटनंतर अनेक माध्यमांनी अशा प्रकारचे वृत्त दिले. या अहवालानंतर पीआयबीने याची सत्यता पडताळली असून, हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. पीआयबीने सांगितले आहे की, यूएईकडून भारतीय गव्हाच्या निर्यातीवर आणि पुनर्निर्यातीवर निलंबन लादण्यात आले आहे. परंतु या निलंबनामुळे देशांतर्गत वापरासाठी भारतीय गव्हाच्या आयातीत बदल होणार नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)