Renaming Aurangabad, Osmanabad: औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराचा राज्य मंत्रिमंडळात पुन्हा निर्णय; लवकरच केंद्र सरकार कडे पाठवणार प्रस्ताव
महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या कॅबिनेट मध्ये हा निर्णय घेतला होता. पण ही कॅबिनेटच अवैध असल्याचं म्हणत नव्या मंत्रिमंडळाने आज पुन्हा नव्याने नामांतराचा निर्णय जाहीर केला आहे.
औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरावर आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झाला आहे. औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजी महाराज नगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशीव होणार आहे. याचा प्रस्ताव विधिमंडळात मंजूर करून घेतला जाईल आणि नंतर केंद्र सरकार कडे तो पाठवला जाईल असे म्हणाले आहेत. यासोबतच नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव दिलं जाणार आहे. हे तिन्ही निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या अखेरच्या मंत्रिमंडळात झाले होते पण ती बहुमताच्या सरकारची राज्य मंत्रिमंडळ बैठक नसल्याने तो अवैध असल्याचं सांगत आज पुन्हा नामांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे.
• नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णय
• एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता. तसेच पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार.#मंत्रिमंडळनिर्णय
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 16, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 16, 2022 12:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

