मध्य रेल्वे मार्गावरील जलद वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण ते ठाकुर्ली रेल्वेमार्गादरम्यान पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. तांत्रिक अडथळा दूर करण्यासाठी रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावर वळविण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईहुन कल्याणकडे आणि कल्याणकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. (हेही वाचा, Mumbai Metro Disrupts: घाटकोपर-वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड; गाड्या 10-15 मिनिटाने उशिराने धावत असल्याने मोठी गर्दी)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)