Maharashtra Rain Update: महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 12 सप्टेंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याने ट्विट करत दिली माहिती

हवामान विभागाने (Meteorological Department) सांगितले की 12 सप्टेंबरपर्यंत कोकण आणि गोवा, गुजरात आणि किनारपट्टी कर्नाटकात मुसळधार ते खूप जोरदार होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain Update: महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 12 सप्टेंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याने ट्विट करत दिली माहिती
Rain | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्र (Maharashtra) आणि संपूर्ण वायव्य भारतात 12 सप्टेंबरपर्यंत पावसाची (rain) शक्यता आहे. यासह, किनारपट्टी कर्नाटक, कोकण आणि गोवा भागातही पाऊस पडू शकतो. मान्सूनच्या स्थितीविषयी माहिती देताना, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितले की 11 सप्टेंबरच्या आसपास उत्तर आणि लगतच्या मध्य बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. जे 24 तासांनंतर मजबूत होईल. हवामान विभागाने (Meteorological Department) सांगितले की 12 सप्टेंबरपर्यंत कोकण आणि गोवा, गुजरात आणि किनारपट्टी कर्नाटकात मुसळधार ते खूप जोरदार होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात याच काळात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडू शकतो.  याशिवाय, 12 सप्टेंबरपर्यंत उत्तर-पश्चिम भारतातील बहुतेक भागात पाऊस पडू शकतो.

आयएमडीने सांगितले की जम्मू -काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम राजस्थानमध्ये 11 सप्टेंबरपर्यंत आणि उत्तराखंड आणि पूर्व राजस्थानमध्ये 12 सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे, 11-12 सप्टेंबरपर्यंत बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गंगाच्या पश्चिम बंगाल, ओडिशा, किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पावसात वाढ होईल.

मान्सूनच्या पहिल्या तीन महिन्यांत सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पण सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस सुरू राहील. जो मान्सूनच्या अभावाची पूर्तता करू शकेल.  स्कायमेट वेदरने आपल्या एका अहवालात म्हटले आहे की 2007 नंतर सप्टेंबर महिन्यात 2021 मध्ये सर्वाधिक पाऊस पडेल. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुजरात आणि महाराष्ट्र सारख्या राज्यात चांगला पाऊस होईल. दुसरीकडे, 11 ते 18 सप्टेंबर दरम्यान ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये आणखी एक चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. हेही वाचा Covid-19 Third Wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंबंधित केलेल्या वक्तव्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांचे स्पष्टीकरण

जर या महिन्यात मुसळधार पाऊस पडत असेल आणि त्याच्याबरोबर वाराही वाहत असेल तर पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या महिन्याच्या पावसामुळे शेतात जे पाणी साचणार आहे. ते सुकण्यास वेळ लागेल. यामुळे खरीप पिकांच्या काढणीस विलंब होईल. ज्यामुळे आगामी रब्बी पिकांच्या पेरणीवर परिणाम होऊ शकतो.

(The above story first appeared on LatestLY on Sep 08, 2021 09:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).