Koregaon Bhima Case: भीमा कोरोगाव हिंसाचार प्रकरणी परमबीर सिंह आणि आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना बजावले समन्स

कोरेगाव भीमा (Bhima Korogaon) चौकशी आयोगाने शुक्रवारी भीमा कोरोगाव हिंसाचार प्रकरणी (Bhima Korogaon violence case) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) आणि आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना समन्स (Summons) बोलावण्याचे आदेश पारित केले आहेत.

Koregaon Bhima Case: भीमा कोरोगाव हिंसाचार प्रकरणी परमबीर सिंह आणि आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना बजावले समन्स
Param Bir Singh | (Photo Credits-ANI)

कोरेगाव भीमा (Bhima Korogaon) चौकशी आयोगाने शुक्रवारी भीमा कोरोगाव हिंसाचार प्रकरणी (Bhima Korogaon violence case) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) आणि आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना समन्स (Summons) बोलावण्याचे आदेश पारित केले आहेत. आयोगाने त्यांना 08 नोव्हेंबर रोजी हजर राहण्याचे समन्स जारी केले आहे. 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणी सुरू असलेल्या तपासात त्याला साक्षीदार म्हणून उपस्थित राहावे लागेल. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना 08 नोव्हेंबरपर्यंत समन्सला उत्तर द्यायचे आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या वेळी परमबीर सिंह अतिरिक्त पोलीस महासंचालक होते. त्याचवेळी रश्मी शुक्ला पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या. आयोगाच्या वकिलांनी शुक्रवारी एका अर्जात म्हटले आहे की, परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांना साक्षीदार म्हणून बोलावले पाहिजे, कारण हिंसाचाराशी संबंधित दोन अधिकाऱ्यांकडून मिळालेली गुप्तचर आणि सर्व माहिती समोर आणणे आवश्यक आहे. हा अर्ज स्वीकारण्यात आला. हेही वाचा Nawab Malik Gets Threatening Calls: समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांनंतर नवाब मलिक यांना धमकीचे फोन्स; तात्काळ सुरक्षेत वाढ

त्याचबरोबर, आजकाल परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला वेगवेगळ्या वादात अडकले आहेत. रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंग हे दोघेही 1988 च्या IPS बॅचचे आहेत. रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक आहेत.  त्यापूर्वी त्या डीजी या पदावर होत्या. राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्त असताना त्यांनी अनिल देशमुख यांच्याबद्दल तक्रार केली होती.

त्याचवेळी मुंबईचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोपांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिल्यानंतर परमबीर सिंह यांना मुंबई पोलिस आयुक्त म्हणून काढून टाकण्यात आले. त्यांनी आरोप केला की देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाजे यांना दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते.

मुकेश अंबानींच्या निवासस्थानी बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएने वाजेला अटक केली होती. वाजे यांच्या अटकेनंतर परम बीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना ते पत्र लिहिले. त्याचवेळी, महाराष्ट्रात परमबीर सिंग यांच्याविरोधात पाच एफआयआर नोंदवण्यात आले आहेत आणि त्यांच्याशी संबंधित प्रकरणांचा तपास सुरू आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 22, 2021 07:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).