राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रसंग राज्यावर ओढविणे, हे अतिशय दुर्दैवी असून महाराष्ट्रात लवकरच स्थिर सरकार मिळेल असा विश्वास भाजपा विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकाद्वारे म्हटले आहे. राज्यात अनेक गंभीर प्रश्न असून या राजकीय अस्थिरतेमुळे राज्यात होणा-या गुंतवणुकीवर त्याचा विपरित परिणाम होईल. म्हणूनच माझी अपेक्षा आहे की सर्वच पक्ष या स्थितीचा गांभीर्याने विचार करतील आणि राज्याला स्थिर सरकार लवकरच मिळेल, अशी आपण अपेक्षा करतो असेही त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागणे हे दुर्दैवी,
स्थिर सरकार मिळेल, ही अपेक्षा : देवेंद्र फडणवीस pic.twitter.com/KQjUFH5taw— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 12, 2019
'मी आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप प्रयत्नशील असून सत्ता स्थापनेसाठी भाजपला सर्वतोपरी मदत करेन' असे नारायण राणे यांनी सांगितले. तसेच शिवसेना राष्ट्रवादी, काँग्रेससह जाऊ शकत नाही असेही ते पुढे म्हणाले. महाआघाडी शिवसेनेला 'उल्लू' बनवत असून शिवसेनेची वागणूक नैतिकतेला धरुन नाही असे नारायण राणे म्हणाले.
शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा कायम असून राज्यपालांच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली असून राष्ट्रपती राजवट लागू करण्यावर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी टीका केली आहे. तसेच राष्ट्रवादीशी चर्चा केल्यानंतरच शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले.काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मिळणे आवश्यक असून तुर्तास निर्णय नाही.
Ahmed Patel, Congress: The way President's rule was recommended, I condemn it. This government has violated the SC guidelines on President's rule on several occasions in in the last 5 years. #Mumbai #MaharashtraGovtFormation pic.twitter.com/P25f8QDI9D— ANI (@ANI) November 12, 2019
रिट्रीट हॉटेलमध्ये शिवसेना नेत्यांची बैठक संपली असून, राष्ट्रपती राजवटीला घाबरण्याचे कारण नाही असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना सांगितले आहे. तसेच आपण आपल्या मागण्यांवर ठाम राहायचे असेही त्यांनी सांगितले आहेत.
काँग्रेस नेत्यांशी पत्रकार परिषदेत चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार.
मुख्यमंत्री पदासह सत्तेचे समान वाटप व्हायला हवं असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेकडे पाठवला आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याचे या प्रस्तावात म्हटले आहे. तसेच बाहेरुन पाठिंब्याऐवजी काँग्रेसने सत्तेत सहभागी व्हावं असेही राष्ट्रवादीने म्हटले आहे.
शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे थोड्याच वेळात शिवसेना नेत्यांशी चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेसच्या भूमिकेनंतर सेना आमदारांशी खलबतं सुरु
महाराष्ट्रात राजकीय वातावरण पेचात सापडल्याने अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या आदेशावर राष्ट्रपतींकडून मोहर मिळाली असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.
President's Rule imposed in the state of #Maharashtra, after the approval of President Ram Nath Kovind. pic.twitter.com/tR3qW4xYbR— ANI (@ANI) November 12, 2019
शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की, शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करायची यावर विचार करण्यासाठी दिल्लीतून काँग्रेस नेते मल्लिकार्जून खडगे, अहमत पटेल आणि सी.के. वेणुगोपाल हे मुंबईत दाखल झाले आहेत. हे तिन्ही नेते काँग्रेसचे राज्यातील नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत तसेच, गरज असल्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.
Maharashtra Government Formation Live News Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चा निकाल लागला. या निकालात भाजप (BJP) – 105, शिवसेना (Shiv Sena) – 56, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) – 54, काँग्रेस(Congress) – 44, बहुजन विकास आघाडी – 03, प्रहार जनशक्ती – 02, एमआयएम – 02, समाजवादी पक्ष – 02, मनसे – 01, माकप – 01, जनसुराज्य शक्ती – 01, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01, शेकाप – 01, रासप – 01, स्वाभिमानी – 01, अपक्ष – 13 जागांवर विजयी झाले. या निकालानंतर सर्वांनाच उत्सुकता होती सत्तास्थापना कशी होते याकडे. मात्र, शिवसेना-भाजप यांच्यात सत्तासंघर्ष तयार झाला आणि सेना-भाजप युतीला जनादेश असतानाही राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नाही. त्यामुळे आम्ही बहुमत सिद्ध करु शकत नाही हे भाजपला सांगावे लागले. त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले. मात्र, शिवसेनाही बहुमत सिद्ध करु शकली नाही. आता राज्यापालांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाचारण केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभूतपूर्व असा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. आज तरी हा पेच सुटणार का? याबाबत महाराष्ट्राला उत्सुकता आहे. लेटेस्टली मराठी वाचकांची ही उत्सुकता ध्यानात घेऊनच आम्ही क्षणाक्षणाच्या घडामोडी आपणांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यासाठी लेटेस्टली मराठीसोबत जोडलेल जा.