Chhatrapati Shivaji Maharaj International Airport: प्रवाशांनो लक्ष द्या! भारत-पाक तणावादरम्यान मुंबई विमानळाने जारी केली सुचना, घ्या जाणून

तणावानंतर सुरक्षा उपाययोजना आणि हवाई क्षेत्रात बदल करण्याच्या पार्श्वभूमीवर ही सूचना देण्यात आली आहे. प्रवाशांना शेवटच्या क्षणी होणारे कोणतेही व्यत्यय टाळण्यासाठी, थेट विमान कंपन्यांशी त्यांच्या विमान प्रवासाची स्थिती पडताळून पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj International Airport: प्रवाशांनो लक्ष द्या! भारत-पाक तणावादरम्यान मुंबई विमानळाने जारी केली सुचना, घ्या जाणून
Chhatrapati Shivaji Maharaj International Airport | (Photo Credit - Twitter/ANI)

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने (CSMIA) ने एक सार्वजनिक सूचना जारी केली आहे. यामध्ये प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या विमानाची स्थिती तपासण्याचे आवाहन केले आहे. बुधवारी शेअर केलेल्या या सूचनेचे उद्दिष्ट, विमान वाहतुकीतील संभाव्य व्यत्ययांमुळे प्रवाशांना होणारी गैरसोय कमी करणे आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये असलेल्या नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य केले. त्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव आणखी वाढला आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी इशारा जारी करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने पोस्टमध्ये म्हटले आहे की, ’प्रवासी सल्लागार, देशभरातील हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि काही विमानतळ बंद झाल्यामुळे, उड्डाण ऑपरेशन्सवर परिणाम होऊ शकतो. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या संबंधित विमान कंपन्यांशी त्यांच्या उड्डाणांच्या स्थितीबद्दल चौकशी करावी. आम्ही तुमच्या सहकार्याचे आभार मानतो.’ तणावानंतर सुरक्षा उपाययोजना आणि हवाई क्षेत्रात बदल करण्याच्या पार्श्वभूमीवर ही सूचना देण्यात आली आहे. प्रवाशांना शेवटच्या क्षणी होणारे कोणतेही व्यत्यय टाळण्यासाठी, थेट विमान कंपन्यांशी त्यांच्या विमान प्रवासाची स्थिती पडताळून पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सुचना- 

यासह, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी गुरुवारी पूर्व-मान्सून धावपट्टी देखभालीसाठी सहा तासांसाठी तात्पुरती बंद राहणार आहे. सीएसएमआयएने 8 मे रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत धावपट्ट्याच्या देखभालीचे नियोजन केले आहे. या काळात, प्राथमिक धावपट्टे 09/27 आणि दुय्यम धावपट्टे 14/32 दोन्ही तात्पुरते बंद राहतील. विमानतळाने याबाबत सहा महिन्यांपूर्वीच नोटिस टू एअरमेन (NOTAM) जारी केले होते, ज्यामुळे विमान कंपन्यांना त्यांच्या वेळापत्रकात समायोजन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. (हेही वाचा: Operation Sindoor: 'हे घडायलाच हवे होते', पीओकेमधील दहशतवादी छावण्यांवरील हल्ल्यावर पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या पत्नींच्या प्रतिक्रीया)

या सहा तासांच्या कालावधीत कोणतीही विमाने उतरणार किंवा उड्डाण करणार नाहीत, ज्यामुळे सुमारे 200 हून अधिक उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ही देखभाल प्रक्रिया विमानतळाच्या मान्सूनपूर्व तयारीचा भाग आहे. दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत 7 मे रोजी बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर झालेल्या भारतीय हल्ल्यांमुळे, देशभरातील हवाई क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे हवाई क्षेत्रात प्रतिबंध आणि काही विमानतळांच्या तात्पुरत्या बंदीची शक्यता निर्माण झाली आहे. अकासा एअर, इंडिगो आणि एअर इंडिया यासारख्या विमान कंपन्यांनीही प्रवाशांना त्यांच्या उड्डाणांच्या स्थितीची पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 7565 05:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).