Lok Sabha Elections 2019: चौकीदार शोधायला नेपाळला जाईन, देशात पंतप्रधान हवा चौकीदार नको: हार्दिक पटेल
काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी देशासाठी पंतप्रधान हवा आहे,त्यासाठी चौकीदाराची गरज नाही" असं मत मांडत मोदींच्या 'मै भी चौकीदार' मोहिमेला लगावला टोला.
देशभरातील 117 जागांसाठी लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Elections 2019) तिसऱ्या टप्प्यातील(Third Phase Voting) मतदान मोठ्या उत्साहात पार पडत आहे. या निमित्ताने वेगवेगळे राजकारणी, सेलिब्रिटी,यांनी आपला मतदानाचा हक्क बजावत सामान्य जनतेलाही न चुकता मत द्या असे आवाहन केले आहे. काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी देखील नुकतंच विरंगम (Viramgam) मतदान केंद्रावर मत दिले, बाहेर पडताना माध्यमांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) 'मै भी चौकीदार' विधानावर टीका केली आहे.
"चौकीदार हवा असेल तर मी नेपाळ ला जाईन, देशासाठी पंतप्रधान हवा आहे, देशातील अर्थव्यवस्था व शिक्षण व्यवस्था भक्कम करू शकेल तसेच तरुणाईसाठी आणि सैन्याला बळ देण्यासाठी काम करेल असा पंतप्रधान हवा आहे,त्यासाठी चौकीदाराची गरज नाही" असं मत त्यांनी यावेळी मांडलं.
ANI ट्विट (See Video)
Congress leader Hardik Patel after casting his vote in Viramgam,says "Chowkidaar dhoondhna hoga toh mein Nepal chala jaaunga, mujhe desh mein PM chahiye jo iss desh ke arthvyavastha ko, shiksha ko, yuvaon, jawanon ko mazboot kar sake. Mujhe chowkidar nahi pradhan mantri chahiye." pic.twitter.com/dYGjy7S7YW
— ANI (@ANI) April 23, 2019
हार्दिक पटेल यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील चांगलीच चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी सुरेंद्र नगर येथे एका सभेत बोलत असताना एका तरुणाने हार्दिक पटेलांच्या कानाखाली मारले होते. गुजरात: भरसभेत काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली (Watch Video)
या घटनेचा संदर्भ देत नेटकऱ्यांनी हार्दिक यांनाच ट्रोल करायला सुरवात केली आहे. नेपाळच्या बाबतीत हार्दिक यांनी केलेले हे विधान अपमानास्पद असल्याचे मत देखील मांडले जातेय.
हार्दिक पटेलना नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा ट्रोल
Hardik ko ye chahiye pic.twitter.com/mwqfVunwwR
— Chowkidar NaMo_2019 (@newIndia_2019) April 23, 2019
#Phase3 It's an insult to our Nepali friends. This man wants to say Nepal produces only Chowkidars?
— Satya Prakash (@SatyaaPrakaash) April 23, 2019
आज राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडेल. तर चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल, सोमवारी होणार आहे. 23 मे रोजी मतमोजणी झाल्यानंतर जनतेचा कौल लक्षात येईल.
(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2019 01:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

