
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमधील बदामी बाग कॅन्टला भेट दिल्यानंतर, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) शुक्रवारी गुजरातमधील भूज हवाई दल तळावर (Bhuj Airbase) पोहोचले, जिथे त्यांनी भारतीय लष्कराच्या जवानांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. भूज हवाई दल तळाच्या भेटीदरम्यान त्यांनी तेथील लष्करी कर्मचाऱ्यांना संबोधित केले. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे की, 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल.'
राजनाथ सिंह यांनी पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या सर्व निष्पाप नागरिकांना आणि 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, आपल्या देशाच्या बलवान अंग असलेल्या भूजमध्ये तुम्हा सर्वांमध्ये असल्याचा मला खूप अभिमान आहे. या भूजने 1965 मध्ये पाकिस्तानविरुद्धचा आपला विजय पाहिला आहे. या भूजने 1971 मध्ये पाकिस्तानविरुद्धचा आपला विजय पाहिला आहे. आणि आज पुन्हा एकदा, या भूजने पाकिस्तानविरुद्धचा आपला विजय पाहिला आहे. भूजच्या मातीत देशभक्तीचा सुगंध आहे आणि त्याच्या सैनिकांमध्ये भारताचे रक्षण करण्याचा अढळ संकल्प आहे. मी सशस्त्र दल आणि बीएसएफच्या सर्व शूर सैनिकांना, ज्यामध्ये तुम्हा सर्व हवाई योद्ध्यांचा समावेश आहे, सलाम करतो. (हेही वाचा - Jamia Millia Islamia Suspends MoUs With Turkey: राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव जेएनयुनंतर आता जामिया मिलिया इस्लामियानेही रद्द केले तुर्कीसोबतचे सामंजस्य करार)
राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, काल मी भारताच्या उत्तरेकडील भागात सैनिकांना भेटलो. आज मी भारताच्या पश्चिम भागातील हवाई योद्ध्यांना आणि सैनिकांना भेटत आहे. दोन्ही आघाड्यांवरील उच्च ऊर्जा आणि उच्च उत्साह पाहून, मला पुन्हा एकदा खात्री पटली आहे की तुमच्या मजबूत बाहूंमध्ये भारताच्या सीमा पूर्णपणे सुरक्षित आहेत.
#WATCH | #OperationSindoor | Gujarat: Defence Minister Rajnath Singh says, "It would not be incorrect for me to say that the duration people take to have breakfast, you used that duration to deal with enemies. You dropped missiles by going to the land of enemies. Its echo did… pic.twitter.com/ET8F1kjcoq
— ANI (@ANI) May 16, 2025
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान तुम्ही जे केले त्यामुळे संपूर्ण देशाला अभिमान वाटला आहे. भारतीय हवाई दलासाठी, पाकिस्तानी भूमीवर वाढणाऱ्या दहशतीच्या अजगराला चिरडून टाकण्यासाठी फक्त 23 मिनिटे पुरेशी होती. लोकांना नाश्ता करायला जितका वेळ लागतो, तितक्यात तुम्ही शत्रूंना संपवले असे मी म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. शत्रूच्या हद्दीत तुम्ही टाकलेल्या क्षेपणास्त्रांचा प्रतिध्वनी संपूर्ण जगाने ऐकला. आणि प्रत्यक्षात, तो प्रतिध्वनी फक्त क्षेपणास्त्रांचा नव्हता, तो प्रतिध्वनी तुमच्या शौर्याचा आणि भारताच्या पराक्रमाचा होता.
'ऑपरेशन सिंदूर'चे जगभरात कौतुक -
'ऑपरेशन सिंदूर' मध्ये भारतीय हवाई दलाने बजावलेल्या प्रभावी भूमिकेचे केवळ या देशातच नव्हे तर इतर देशांमध्येही कौतुक केले जात आहे. या ऑपरेशनमध्ये तुम्ही केवळ शत्रूवर वर्चस्व गाजवले नाही तर त्यांना संपवण्यातही यशस्वी झाला आहात. दहशतवादाविरुद्धची ही मोहीम आपल्या हवाई दलाने चालवली. आपले हवाई दल हे असे 'स्काय फोर्स' आहे, ज्याने आपल्या शौर्य, पराक्रम आणि वैभवाने आकाशाच्या नवीन आणि उंच उंची गाठल्या आहेत, असंही यावेळी राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.