उत्तर प्रदेश मधील औरैया येथे झालेल्या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या भावना (View Tweets)
उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात झालेल्या ट्रक अपघातात 24 मजूरांचा मृत्यू झाला आहे. यादुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे घरी निघालेल्या एकूण 24 मजूरांवर काळाचा घाला झाला आहे. हे मजूर राजस्थानवरुन बिहार आणि झारखंड येथील आपल्या गावी जाण्यासाठी ट्रकमधून निघाले होते. शनिवार (16 मे) पहाटे 3:30 च्या सुमारास ट्रकचा भीषण अपघात झाला. हा अपघात उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात असून यात एकूण 24 मजूरांचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर 15 मजूर गंभीररित्या जखमी झाले आहेत. या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून खेद व्यक्त केला आहे. (धक्कादायक! उत्तर प्रदेश च्या मिहौली राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, 23 मजूर ठार तर 15 जण गंभीर जखमी)
"उत्तर प्रदेशातील औरैया येथे झालेला अपघात अत्यंत दुःखद आहे. यासाठी सरकारचे मदतकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मजूरांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट:
उत्तर प्रदेश के औरैया में सड़क दुर्घटना बेहद ही दुखद है। सरकार राहत कार्य में तत्परता से जुटी है। इस हादसे में मारे गए लोगों के परिजनों के प्रति अपनी संवेदना प्रकट करता हूं, साथ ही घायलों के जल्द से जल्द स्वस्थ होने की कामना करता हूं।
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2020
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील ट्विट करत दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. "मजूरांच्या मृत्यूची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मजूरांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो," असे ट्विट राजथान सिंह यांनी केले आहे.
राजनाथ सिंह ट्विट:
उत्तर प्रदेश के औरैया में हुए सड़क हादसे में कई श्रमिकों की मृत्यु के बारे में जानकर अत्यंत दुख हुआ है।इस दुर्घटना में जिन लोगों की जान गई है, मैं उनके परिजनों के प्रति अपनी संवेदना प्रकट करता हूं।साथ ही दुर्घटना में घायल हुए मज़दूरों के जल्द से जल्द स्वस्थ होने की कामना करता हूँ
— Rajnath Singh (@rajnathsingh) May 16, 2020
कोरोना व्हायरसचा धोक्यामुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे घरी परतत असलेल्या अनेक मजूरांच्या अपघाताच्या घटना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहेत. यापूर्वी मध्य प्रदेश मध्ये झालेल्या अपघातात 8 मजूरांचा मृत्यू झाला होता तर 50 जण जखमी झाले होते. तर औरंगाबाद येथे रुळावर झोपलेल्या 16 मजूरांचा मालगाडीच्या अपघातात दुर्दैवी अंत झाला होता.
(The above story first appeared on LatestLY on May 16, 2020 11:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

