Student Suicide Rate Grow: भारतात लोकसंख्या वाढीपेक्षा विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण जास्त; IC3 अहवालात चिंताजनक खुलासा

देशात ज्या दराने लोकसंख्या वाढत आहे त्यापेक्षा जास्त वेगाने विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. हा चिंताजनक खुलासा एका नव्या अहवालात करण्यात आला आहे. 2021 ते 2022 दरम्यान, पुरुष विद्यार्थ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या, तर महिला विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत.

Student Suicide Rate Grow: भारतात लोकसंख्या वाढीपेक्षा विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण जास्त; IC3 अहवालात चिंताजनक खुलासा
Photo Credit- X

Student Suicide Rate Grow: भारतात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या (Student Suicide) घटना वाढत आहेत, ही चिंतेची बाब आहे. यासंदर्भातील नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालात या विषयावर आणखी एक चिंताजनक खुलासा झाला आहे. अहवालानुसार, भारतातील विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा जास्त आहे. एवढेच नाही तर हा दर एकूण आत्महत्येचा दरही ओलांडला आहे.नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) डेटाच्या आधारे, वार्षिक IC3 कॉन्फरन्स आणि एक्स्पो 2024 मध्ये बुधवारी "विद्यार्थी आत्महत्या भारतातील महामारी" हा अहवाल लॉन्च करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत 4 टक्क्यांनी वाढ

अहवालात असे नमूद केले आहे की आत्महत्यांच्या एकूण संख्येत वार्षिक 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, विद्यार्थी आत्महत्या प्रकरणांमध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणांची अंडर-रिपोर्टिंग शक्यता आहे.

IC3 संस्थेने संकलित केलेल्या अहवालात म्हटले आहे की, 'गेल्या दोन दशकांमध्ये, विद्यार्थी आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक वार्षिक 4 टक्के, राष्ट्रीय सरासरीच्या दुप्पट वाढले आहे. 2022 मध्ये, एकूण विद्यार्थी आत्महत्यांमध्ये 2021 आणि 2022 मध्ये, पुरुष विद्यार्थ्यांच्या आत्महत्या 6 टक्क्यांनी कमी झाल्या, तर विद्यार्थिनींच्या आत्महत्या 7 टक्क्यांनी वाढल्या.'

लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा विद्यार्थ्यी आत्महत्येचे प्रमाण जास्त 

अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, 0-24 वर्षे वयोगटातील मुलांची लोकसंख्या गेल्या दशकात 582 दशलक्ष वरून 581 दशलक्ष पर्यंत घसरली आहे, तर विद्यार्थी आत्महत्यांची संख्या 6,654 वरून 13,044 पर्यंत वाढली आहे.

या राज्यांमध्ये अधिक प्रकरणे

अहवालानुसार, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश ही राज्ये आहेत जिथे विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होतात.आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देशातील एकूण आत्महत्यांपैकी एक तृतीयांश आहे. यापैकी 29 टक्के प्रकरणे दक्षिणेकडील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत. तर, राजस्थान 10 व्या क्रमांकावर आहे.

महिलांच्या आत्महत्यांमध्ये 61 टक्क्यांनी वाढ 

अहवालात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या दशकभरात पुरुषांच्या आत्महत्येत 50 टक्क्यांनी तर महिलांच्या आत्महत्यांमध्ये 61 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत दोघांमध्ये सरासरी वार्षिक 5 टक्के वाढ झाली आहे.

वास्तविक संख्या जास्त असू शकते

एनसीआरबीने जारी केलेला डेटा पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरवर आधारित आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची वास्तविक संख्या कदाचित यापेक्षा जास्त असू शकते. गाव खेड्यांमध्ये काही वेळा मृत्यूची नोंद होत नाही. यासाठी अनेक घटक कारणीभूत असू शकतात.

 

(The above story first appeared on LatestLY on Aug 29, 2024 10:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).