पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप प्रणीत एनडीए सरकारने 'अग्निपथ' योजनेंतर्गत काढलेल्या लष्कर भरतीवरुन देशभरातील युवकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. अनेक युवकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरु आहे. बिहार राज्यात आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचे समोर आले आहे.