महाराष्ट्रात 17 ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. राज्यात राजकीय नाट्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक पहिल्यांदाचं आमनेसामने येणार आहेत. मंत्रीमंडळ स्थापन आणि खातेवाटप नंतर नवनिर्वाचित सरकारच्या या पहिल्या अधिवेशनातून जनतेला दिलासा मिळणार का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.