Year Ender 2024: भारताने 17 वर्षांनंतर पटकावले टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद, रोहित-कोहलीच्या निवृत्तीने चाहते निराश
2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाच्या छायेत सुरु झालेल्या या वर्षापासून भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या, ज्याची पूर्तता अखेर 29 जून 2024 रोजी भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिज आणि यूएसए येथे झालेल्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करत पूर्ण केली.
Year Ender 2024: डिसेंबर महिना येऊन ठेपला असून हे वर्ष हळुहळु शेवटाकडे सरकत आहे. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाच्या छायेत सुरु झालेल्या या वर्षापासून भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या, ज्याची पूर्तता अखेर 29 जून 2024 रोजी भारतीय क्रिकेट संघाने (Team India) वेस्ट इंडिज आणि यूएसए येथे झालेल्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करत पूर्ण केली. आणि टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले. भारताने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) जिंकला. या स्पर्धेत काय खास होते ते जाणून घेऊया.
𝗖.𝗛.𝗔.𝗠.𝗣.𝗜.𝗢.𝗡.𝗦 🏆#TeamIndia 🇮🇳 HAVE DONE IT! 🔝👏
ICC Men's T20 World Cup 2024 Champions 😍#T20WorldCup | #SAvIND pic.twitter.com/WfLkzqvs6o
— BCCI (@BCCI) June 29, 2024
भारताने एकही सामना गमावला नाही
या स्पर्धेतील भारतीय क्रिकेट संघाचा प्रवास सुरुवातीपासूनच खास राहिला आहे. संघाने 2024 च्या विश्वचषक स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाहीआणि अंतिम फेरीपर्यंत एकूण 10 सामने जिंकून विजेतेपद पटकावले. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक बळी घेतले, तर हार्दिक पांड्यासह इतर खेळाडूही हिरो ठरले. (हे देखील वाचा: Year Ender 2024: दक्षिण आफ्रिका असो वा पाकिस्तान! 'या' कमकूवत संघाकडून झाला लाजीरवाणा पराभव; या वर्षातील क्रिकेटमधील सर्वात मोठ्या अपसेटवर एक नजर)
रोमहर्षक पद्धतीने फायनल जिंकली
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेलेला विजेतेपदाचा सामना अतिशय रोमांचक झाला आणि भारताने दिलेल्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघ एके काळी विजयाच्या जवळ पोहोचला होता आणि त्यांना 30 चेंडूत केवळ 30 धावा करायच्या होत्या पण भारताने हार मानली नाही. प्रथम क्लासेनला बाद केले, तर शेवटच्या षटकात सूर्यकुमार यादवने कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा झेल घेत मिलरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला.
कोहली-रोहितच्या निवृत्तीमुळे चाहते दु:खी
एकीकडे, भारताने 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर चाहते जल्लोष करत होते आणि त्याच दरम्यान, विराट कोहली आणि रोहित शर्मा, ज्यांनी भारतीय संघाला वर्षानुवर्षे आपल्या खांद्यावर वाहून नेले, त्यांनी टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्यानंतर रवींद्र जडेजानेही या फॉरमॅटला अलविदा केला आणि यासोबतच एका सुवर्णकाळाचा अंत झाला. मात्र, या निर्णयामुळे चाहत्यांची काहीशी निराशा झाली.
(The above story first appeared on LatestLY on Dec 12, 2024 01:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

