Women's World Cup 2022: अशी 5 कारणे ज्यामुळे भारतीय संघ बनतो विश्वचषक विजयाचा दावेदार, ‘या’ खेळाडूंची भूमिका निर्णायक ठरेल

ICC Women's World Cup 2022: मिताली राजचा भारतीय संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध सामन्याने आपले पहिले विश्वचषक जिंकण्याच्या मोहिमेची सुरुवात करेल. यावेळी संघाची तयारी पूर्ण आहे आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा दावेदार मानला जात आहे. याचीही काही कारणे आहेत जाणून घेऊया भारतीय महिला संघाची ताकद ज्यामुळे ते यंदा विश्वविजेता बनू शकतात.

क्रिकेट Priyanka Vartak|
Women's World Cup 2022: अशी 5 कारणे ज्यामुळे भारतीय संघ बनतो विश्वचषक विजयाचा दावेदार, ‘या’ खेळाडूंची भूमिका निर्णायक ठरेल
भारतीय महिला क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/BCCI)

ICC Women's World Cup 2022: मिताली राजचा भारतीय संघ (Indian Team) न्यूझीलंड येथे 4 मार्चपासून सुरु होणाऱ्या महिला विश्वचषक (Women's World Cup) स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान (Pakistan) संघाविरुद्ध सामन्याने टीम इंडिया आपले पहिले विश्वचषक जिंकण्याच्या मोहिमेची सुरुवात करेल. भारतीय महिला संघाचा (India Women's Team) पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 6 मार्च रोजी खेळला जाणार आहे. अनुभवी मिताली राजच्या (Mithali Raj) नेतृत्वातील संघाने इंग्लंड येlatestly.com/sports/cricket/womens-world-cup-2022-top-5-reasons-why-indian-team-can-win-maiden-title-these-players-role-will-be-crucial-332954.html&text=Women%27s+World+Cup+2022%3A+%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%80+5+%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87+%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87+%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98+%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%8B+%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95+%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE+%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%2C+%E2%80%98%E0%A4%AF%E0%A4%BE%E2%80%99+%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80+%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE+%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95+%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2&via=LatestLYMarathi" title="Tweet">

Women's World Cup 2022: अशी 5 कारणे ज्यामुळे भारतीय संघ बनतो विश्वचषक विजयाचा दावेदार, ‘या’ खेळाडूंची भूमिका निर्णायक ठरेल

ICC Women's World Cup 2022: मिताली राजचा भारतीय संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध सामन्याने आपले पहिले विश्वचषक जिंकण्याच्या मोहिमेची सुरुवात करेल. यावेळी संघाची तयारी पूर्ण आहे आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा दावेदार मानला जात आहे. याचीही काही कारणे आहेत जाणून घेऊया भारतीय महिला संघाची ताकद ज्यामुळे ते यंदा विश्वविजेता बनू शकतात.

क्रिकेट Priyanka Vartak|
Women's World Cup 2022: अशी 5 कारणे ज्यामुळे भारतीय संघ बनतो विश्वचषक विजयाचा दावेदार, ‘या’ खेळाडूंची भूमिका निर्णायक ठरेल
भारतीय महिला क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/BCCI)

ICC Women's World Cup 2022: मिताली राजचा भारतीय संघ (Indian Team) न्यूझीलंड येथे 4 मार्चपासून सुरु होणाऱ्या महिला विश्वचषक (Women's World Cup) स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान (Pakistan) संघाविरुद्ध सामन्याने टीम इंडिया आपले पहिले विश्वचषक जिंकण्याच्या मोहिमेची सुरुवात करेल. भारतीय महिला संघाचा (India Women's Team) पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 6 मार्च रोजी खेळला जाणार आहे. अनुभवी मिताली राजच्या (Mithali Raj) नेतृत्वातील संघाने इंग्लंड येथे झालेल्या स्पर्धेच्या शेवटच्या आवृत्तीत जेतेपदाची अंतिम सामन्यात प्रवेश केला, पण त्यांना उपविजते पदावर समाधान मानावे लागले. पण यावेळी संघाची तयारी पूर्ण आहे आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा दावेदार मानला जात आहे. याचीही काही कारणे आहेत जाणून घेऊया भारतीय महिला संघाची ताकद ज्यामुळे ते यंदा विश्वविजेता बनू शकतात. (ICC Women's World Cup 2022: भारताला मोठा दिलासा; स्मृती मंधाना हिला खेळण्यासाठी मिळाला ग्रीन-सिग्नल, सराव सामन्यात डोक्याला लागला होता खतरनाक बाउन्सर)

1. विश्वचषक सामन्यांमध्ये भारतीय संघाला चांगली सुरुवात करावी लागेल. अशा परिस्थितीत शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांच्यावर विशेष जबाबदारी असेल. रोहतकची शेफाली जलद धावा आणि फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिने आतापर्यंत 11 एकदिवसीय सामने खेळले असून 2 अर्धशतके केली आहेत. वनडेमध्ये त्याचा स्ट्राइक रेट 75 पेक्षा जास्त आहे, तर टी-20 मध्ये तो 141 च्या वर पोहोचला आहे. स्मृती संघाची अनुभवी सलामी फलंदाज आहे. तिने 4 शतके आणि 20 अर्धशतके केली आहेत. यादरम्यान तिचा स्ट्राइक रेट 84 पेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत भारताने चांगली सुरुवात केल्यास विरोधी संघ अडचणीत येऊ शकतो.

2. आपला अखेरचा विश्वचषक खेळणारी दिग्गज कर्णधार मिताली राज हिच्याकडून मधल्या फळीत संघाला पुन्हा एकदा मोठ्या अपेक्षा असतील. 39 वर्षीय मिताली बॅटने संघात सर्वात अनुभवी आहे, ज्याचा फायदा संघाला नक्कीच होईल. ती गेली 23 वर्षे टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करत आहे. मिताली ही संघाची मोठी ताकद आहे आणि ती विजेतेपदाची मोहीम यशस्वी करेल अशी आशा आहे.

3. भारताची तडाखेबाज फलंदाज आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर BBL च्या फॉर्मची पुनरावृत्ती करण्यात संघर्ष करत होती. पण न्यूझीलंड मालिकेच्या अंतिम वनडे सामन्यात अर्धशतक आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामन्यात शतकी खेळी करून तिने पुन्हा लयीत परतण्याचे संकेत दिले आहेत. तसेच हरमनप्रीत मधल्या फळीत मोठे फटके खेळून संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याचा दम ठेवते. याशिवाय कौर संघाची मुख्य अष्टपैलू खेळाडू असेल.

4. गोलंदाजी विभागात झुलन गोस्वामी कर्णधार मिताली राज इतकीच अनुभवी आहे. गोस्वामी ही टीम इंडियाची दुसरी मोठी ताकद आहे. 39 वर्षीय झुलन तिच्या कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक खेळणार असल्याचे मानले जात आहे. अशा परिस्थितीत या दिग्गज वेगवान गोलंदाजाची शेवटची स्पर्धा संस्मरणीय करण्यासाठी केवळ तीच नव्हे तर संपूर्ण संघ देखील प्रयत्नशील असेल. झुलन महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 245 विकेट घेणारी गोलंदाज आहे.

5. कोणत्याही संघासाठी जागतिक स्पर्धांमध्ये अष्टपैलू खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा परिस्थितीत आघाडीची दीप्ती शर्मा ही संघाची महत्त्वाची कडी मानली जात आहे. 24 वर्षीय दीप्तीने आतापर्यंत 69 एकदिवसीय सामन्यांमध्ये 79 बळी घेतले आहेत. इतकंच नाही तर तिने 1 शतक आणि 11 अर्धशतकांसह एकूण 1720 धावा केल्या आहेत. हरमनप्रीतनंतर दीप्ती बॅट आणि बॉलने संघात योगदान देण्यास सक्षम आहे. दीप्ती शेवटच्या काही षटकांत आक्रमक फलंदाजी करून खेळ बदलण्यास सक्षम आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change