IND vs AUS World Cup 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल खेळणार की नाही? रोहित शर्माने दिले मोठे अपडेट

सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) हा टीम इंडियासाठी चिंतेचा विषय राहिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गिल डेंग्यूने ग्रस्त असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यांपासून दूर राहू शकतो.

IND vs AUS World Cup 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल खेळणार की नाही? रोहित शर्माने दिले मोठे अपडेट
Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया (Team India) आयसीसी विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023) मधील आपल्या मोहिमेची सुरुवात रविवार, 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) विरुद्धच्या सामन्याने करेल. याआधी सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) हा टीम इंडियासाठी चिंतेचा विषय राहिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गिल डेंग्यूने ग्रस्त असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यांपासून दूर राहू शकतो. पण रोहित शर्माने (Rohit Sharma) आता गिलच्या खेळाबाबत एक मोठे अपडेट दिले आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS World Cup 2023 Pitch Report: चेन्नईच्या खेळपट्टीवर कोणाला मिळणार मदत, फलंदाज की गोलंदाज? जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल)

शुभमन गिल आजारी आहे

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले की, सर्व खेळाडू आणि संघाचे वातावरण खूप चांगले आहे. आम्ही स्पर्धा सुरू करण्यासाठी खूप उत्सुक आहोत. संघातील प्रत्येकजण तंदुरुस्त आहे आणि शुभमन गिल आजारी असल्याचे मान्य केले तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून तो अद्याप बाहेर पडलेला नाही. मात्र, रिपोर्ट्सनुसार, गिलचे खेळणे खूपच अवघड दिसत आहे. अशाप्रकारे जर गिल खेळला नाही तर टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करताना दिसू शकतो.

भूतकाळाचा काही फरक पडत नाही

विश्वचषकाबाबत रोहित पुढे म्हणाला की आम्ही यापूर्वी काय केले आहे काही फरक पडत नाही. आमच्या ताकदीवर लक्ष केंद्रित करणे, येथील परिस्थितीचे आकलन करणे आमच्यासाठी खूप महत्वाचे असेल कारण खेळपट्ट्या थोड्या कठीण असू शकतात. त्यामुळे खेळादरम्यान अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. मार्चमध्ये आम्ही ऑस्ट्रेलियाशी खेळलो आणि त्या सामन्यात आम्ही मागे राहिलो. पण आपल्यात कुठे कमीपणा होता हे आता कळतंय.

फलंदाजीत अनुभव उपयोगी पडेल

भारतीय परिस्थितीबाबत रोहित शर्मा म्हणाला की, आमच्या संघात जे काही सात ते आठ फलंदाज आहेत. ते सर्व गेममध्ये भिन्न शैली आणतात. त्यामुळे खेळाडूंनी अष्टपैलू असावे अशी माझी इच्छा आहे कारण या परिस्थितीत खेळण्यासाठी तुम्हाला खूप अनुभव हवा आहे. मला माझ्या खेळाडूंना स्वातंत्र्य द्यायचे आहे आणि प्रत्येकाचा संघाला पूर्ण पाठिंबा आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 07, 2023 04:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).