भारताचा टी-20 वर्ल्ड कप विजेता रॉबिन उथप्पा याने नैराश्येत असताना केला होता आत्महत्येता विचार, पाहा कसे सावरले स्वत:ला

भारताच्या पहिल्या टी-20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या रॉबिन उथप्पा याने 2009 ते 2011 दरम्यानचा काळ त्याच्यासाठी कठीण होता. तो नैराश्यात गेला आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला 'बाह्य मदत' घेतली. उथप्पा म्हणाला की, त्याला आत्महत्या करण्याच्या विचारांना सामोरे जावे लागले होते

भारताचा टी-20 वर्ल्ड कप विजेता रॉबिन उथप्पा याने नैराश्येत असताना केला होता आत्महत्येता विचार, पाहा कसे सावरले स्वत:ला
रॉबिन उथप्पा (Photo Credit: Getty Images)

खेळाडूंचा मानसिक तणाव नेहमीच खेळ विश्वात चर्चेचा विषय राहिला आहे. काही याबद्दल उघडपणे व्यक्त होतात, तर काही मौन धारण करून सोसत राहतात. भारताच्या (India) पहिल्या टी-20 वर्ल्ड कप (World Cup) विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याने 2009 ते 2011 दरम्यानचा काळ त्याच्यासाठी कठीण होता. तो नैराश्यात (Depression) गेला आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला 'बाह्य मदत' घेतली. 2006 मध्ये पदार्पण आणि 2007 मध्ये टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा उथप्पा म्हणाला की, त्याला आत्महत्या करण्याच्या विचारांना सामोरे जावे लागले होते आणि जेव्हा तो ऑफ सीझनमध्ये क्रिकेट खेळत नव्हता तेव्हा त्यांच्याशी सामना करणे त्यांच्यासाठी अत्यंत कठीण होते. (भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने 2015 नंतर तीन वेळेस आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक खुलासा)

रॉयल राजस्थान फाउंडेशनच्या संयुक्त पुढाकार 'माइंड, बॉडी अँड सोल'च्या ताज्या सत्रामध्ये बोलताना उथप्पा म्हणाला की हळूहळू स्वत: ला व्यक्ती समजून घेण्यास सुरुवात केल्यानंतर त्याने मदतीची मागणी केली. "जेव्हा मी 2006 मध्ये पदार्पण केले तेव्हा मला स्वतःबद्दल फारशी माहिती नव्हती. यानंतर बरेच काही शिकलो. आता मी माझ्याबद्दल फारच चिंतीत आहे आणि मी खूप विचार करतो. आता मी कुठेही घालो तर मी स्वत:ला सावरू शकतो," उथप्पा म्हणाला. "मला वाटतं की आज मी या ठिकाणी पोहोचलो आहे कारण मला बर्‍याच कठीण क्षणांचा सामना करावा लागला आहे. मी खूप नैराश्यात होतो आणि आत्महत्या करण्याचा विचार करत असे. मला आठवतं की हे 2009 आणि 2011 मध्ये नियमितपणे घडत असत आणि मला दररोज असे विचार यायचे."

"एक काळ असा होता जेव्हा मी क्रिकेटबद्दल विचारच केला नव्हता, तो माझ्या मनापासून खूप दूर गेला होता. मी हा दिवस कसा काढणार आणि दुसर्‍या दिवसापर्यंत जिवंत कसे रहायचे याचा विचार करत राहायचो. कठीण काळात मी एका जागी बसून राहायचो. तीनपर्यंत मोजून धावून बाल्कनीमधून उडी करण्याचाही विचार केला, पण असं काहीतरी असायचं जे मला थांबवत होतं. यानंतर मी डायरी लिहायला सुरुवात केली आणि एक माणूस म्हणून स्वत: ला समजून घेण्याचा प्रयत्न केला. याने मला त्या वाईट टप्प्यातून बाहेर पडून मला पाहिजे ते बनण्यास मदत केली."

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2020 02:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).