Ranji Trophy: सौराष्ट्रविरुद्ध ड्रॉ नंतर मुंबई नॉकआउटमधून बाहेर, गुजरात क्वार्टर-फायनल गाठणारी पहिली टीम

एलिट ग्रुप बी सामन्याच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी सौराष्ट्रविरूद्ध सामना ड्रॉ राहिल्याने 41 वेळा चॅम्पियन मुंबई यंदाच्या रणजी ट्रॉफीच्या नॉकआउट फेरीतून बाहेर पडली आहे. सौराष्ट्रचे धर्मेंद्रसिंह जडेजा आणि कमलेश मकवाना यांनी संयमी खेळी खेळत मुंबईविरुद्ध सामना ड्रॉ केला. ड्रॉ सामन्यात पहिल्या डावाची आघाडीवर सौराष्ट्रला तीन गुण, तर मुंबईला एक गुण मिळाला.

Ranji Trophy: सौराष्ट्रविरुद्ध ड्रॉ नंतर मुंबई नॉकआउटमधून बाहेर, गुजरात क्वार्टर-फायनल गाठणारी पहिली टीम
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

एलिट ग्रुप बी सामन्याच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी सौराष्ट्र (Saurashtra) विरूद्ध सामना ड्रॉ राहिल्याने 41 वेळा चॅम्पियन मुंबई (Mumbai) यंदाच्या रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) नॉकआउट फेरीतून बाहेर पडली आहे. सौराष्ट्रचे धर्मेंद्रसिंह जडेजा आणि कमलेश मकवाना यांनी संयमी खेळी खेळत मुंबईविरुद्ध सामना ड्रॉ केला. ड्रॉ सामन्यात पहिल्या डावाची आघाडीवर सौराष्ट्रला तीन गुण, तर मुंबईला एक गुण मिळाला. मुंबई, रणजी इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. त्याने 41 वेळा जेतेपद जिंकले आहे परंतु या मोसमात त्यांची मोहीम केवळ 14 गुणांवर संपुष्टात आली आहे. आता मुंबईचा सामना मध्य प्रदेशशी (Madhya Pradesh) होणार असून यात विजयी होऊनही मुंबईची नॉकआउट फेरी गाठणे कठीण आहे. एलिट ग्रुप ए आणि बी मधील पहिले 5 संघ उपांत्यपूर्व फेरी गाठतात तर गट सीमधून दोन आणि प्लेट ग्रुपमधील एक संघ पुढील फेरीपर्यंत प्रवेश करेल. (Ranji Trophy: हर्षल पटेल याने मोडला राजेंद्र गोयल यांचा 36 वर्ष  जुना रेकॉर्ड, एका मोसमात घेतल्या सर्वाधिक विकेट्स)

दिल्लीविरुद्ध सामना ड्रॉ झाल्यावर गुजरातने तीन गुणांसह क्वार्टर-फायनल फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे, दिल्ली टीम उपांत्यपूर्व फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडली आहे. दिल्लीला आता फक्त राजस्थानविरुद्ध खेळायचे आहे. त्यांना पात्रतेसाठी कोणतीही संधी तयार करायची असेल तर त्यांना बोनस गुणांसह सात गुण जमा करावे लागतील. परंतु पात्र होण्यासाठी त्यांच्यासाठी 25 गुण पुरेसे नसतील कारण गुजरात, सौराष्ट्र, आंध्र प्रदेश, बंगाल आणि कर्नाटकचे आधीच प्रत्येकी एक-एक सामने शिल्लक असलेले पहिले पाच संघ आहेत. दरम्यान, सात सामन्यांपैकी गुजरातचे 29 गुण असून क्रॉसपूलमध्ये (गट अ आणि ब) अव्वल स्थान पटकावले आहे. नॉकऑउट फेरीत स्थान निश्चित करणारा गुजरात पहिला संघ बनला आहे.

सूर्य सामन्यात जयपूरमध्ये बंगालने राजस्थानविरुद्ध दोन गडी राखून पराभूत केले आणि सहा गुणांसह एकूण 26 गुणांची नोंद केली. राजस्थानने बंगालला 320 धावांचे लक्ष्य दिले होते जे त्यांनी 8 विकेट गमावून गाठले. यात कौशिक घोष, अभिमन्यु एस्वरन आणि शाहबाज अहमद यांनी अर्धशतकी डाव खेळला.

(The above story first appeared on LatestLY on Feb 08, 2020 08:01 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).