Ranji Trophy 2020 Final: सौराष्ट्रचे पहिले रणजी ट्रॉफीचे जेतेपद निश्चित, बंगालला चमत्काराच्या आशा
भारतातील सर्वात मोठी डोमेस्टिक क्रिकेट स्पर्धा रणजी ट्रॉफीच्या बंगालविरुद्ध अंतिम सामन्यात पहिल्या डावाच्या आधारावर 44 धावांची आघाडी घेत सौराष्ट्रने विजय जवळपास निश्चित केला आहे. सौराष्ट्रचे हे पहिले रणजी जेतेपद असेल. मागील वर्षी सौराष्ट्रला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
भारतातील सर्वात मोठी डोमेस्टिक क्रिकेट स्पर्धा रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy)बंगालविरुद्ध (Bengal) अंतिम सामन्यात पहिल्या डावाच्या आधारावर 44 धावांची आघाडी घेत सौराष्ट्रने (Saurashtra) विजय जवळपास निश्चित केला आहे. सौराष्ट्रचे हे पहिले रणजी जेतेपद असेल. मागील वर्षी सौराष्ट्रला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. सौराष्ट्रला आजवर 3 वेळा उपविजेतेपद मिळाले आहेत. सौराष्ट्रने सामन्यात पहिले फलंदाजी केली आणि पहिल्या डावात 425 धावा केल्या. सौराष्ट्रकडून अर्पित वासवडा 101, विश्वराज जडेजा आणि अवि बरोटनी प्रत्येकी 54 आणि चेतेश्वर पुजाराने 66 धावा केल्या. फलंदाजांनी सौराष्ट्रला पहिल्या डावात मजबूत स्थितीत पोहचवले. त्यानंतर गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत बंगालला पाचव्या दिवशी 381 धावांवर ऑलआऊट केले. सामना ड्रॉ च्या जवळ पोहचला आहे, मात्र पहिल्या डावात मिळालेल्या आघाडीवर सौराष्ट्रचे सामान्यसह जेतेपद जिंकणे जवळपास निश्चित आहे. बंगालकडून सुदीप चटर्जीने सर्वाधिक 81 धावा केल्या, तर रिद्धिमान साहानेही 64 धावांचा चांगला डाव खेळला, पण संघाला विजय मिळवता आला नाही. (Ranji Trophy 2020 Final: बंगालविरुद्ध रणजी ट्रॉफी फायनल सामन्यात जयदेव उनाडकटचा सुटला स्वतःवरचा ताबा, रागाच्या भरात तोडला स्टंप Video)
दोन्ही संघांनी अतिशय संथ फलंदाजी केली आणि म्हणूनच पाचव्या दिवसापर्यंत पहिला डाव सुरू होता. रणजी करंडक सामना ड्रॉ होत नाही आणि पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे विजयी-पराभव किंवा गुण दिले जातात. अंतिम सामन्यातही बंगाल पहिल्या डावात सौराष्ट्राच्या 44 धावांनी मागे पडला आणि म्हणूनच त्यांना पराभवाला सामोरे जावे लागू शकते. पाचव्या दिवसाचा खेळ बाकी असल्याने सौराष्ट्र दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी येईल. आता फक्त एक चमत्कारच बंगालला जेतेपद जिनवून देऊ शकते. आता त्यांना सर्व सौराष्ट्र खेळाडूंना उर्वरित ओव्हरमध्ये ऑलआऊट करून मिळालेले लक्ष्य दिवस संपण्याच्या आत गाठायचे आहे. सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनादकटने (Jaydev Unadkat) आपल्या संघाचे शानदार प्रदर्शन केले आणि त्याने स्वत: आश्चर्यकारक कामगिरी केली. या हंगामात उनादकटने 10 सामन्यांच्या 16 डावात सर्वाधिक 67 विकेट्स घेतल्या आहेत. यावेळी त्याने सात डावांमध्ये पाच किंवा अधिक विकेट आणि तीन डावांमध्ये 10 किंवा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. उनाडकाटची सर्वोत्कृष्ट कामगिरी 106 धावांवर 12 गडी आहे.
1950-51 पासून सौराष्ट्र रणजी करंडक स्पर्धेत भाग घेत आहे, परंतु हे त्यांचे पहिले जेतेपद ठरले. 2012-13 आणि 2015-16 मध्ये त्यांना अंतिम सामन्यात मुंबईविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या मोसमातील अंतिम सामन्यातही त्यांचा पराभव झाला होता. गेल्या हंगामात सौराष्ट्रचा पराभव करून विदर्भाने दुसरे रणजी जेतेपद जिंकले होते.
(The above story first appeared on LatestLY on Mar 13, 2020 11:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

