केएल राहुल याला मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी दाखवला मार्ग, टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी दिला 'हा' सल्ला
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध आगामी कसोटी सामन्यांच्या मालिकेतून वगळण्यात आलेल्या केएल राहुलला निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी संघात पुनरागमन करण्यासाठी एक महत्वाचा सल्ला दिला आहे. प्रसाद म्हणाले की, माजी भारतीय फलंदाज व्ही.व्ही. लक्ष्मणच्या पावलांवर चालून राहुल टीम इंडियामध्ये पुनरागमन करू शकतो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जे आपला फॉर्म गमावतात, विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये, त्यांच्यासाठी पुनरागमन करण्यासाठी घरगुती क्रिकेट चांगले व्यासपीठ ठरू शकते. असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी हा मार्ग स्वीकारला आहे आणि गमावलेली लय पुन्हा मिळवल्यानंतर दमदार पुनरागमन केले आहेत. भारतीय संघात असे काही खेळाडू आहेत जे खराब फॉर्मशी झगडत आहेत. केएल राहुल (KL Rahul), शिखर धवन (Shikhar Dhawan)आणि मुरली विजय सध्याच्या भारतीय संघात संघर्ष करत आहेत. धवन आणि विजय खेळाच्या लांब स्वरुपात राष्ट्रीय संघापासून पराभूत झाले, तरी राहुलने संधींचा फायदा करून घेतला नाही आणि निराशही करत राहिले. दक्षिण आफ्रिके (South Africa) विरूद्ध आगामी कसोटी सामन्यांच्या मालिकेतून वगळण्यात आलेल्या राहुलला निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांनी संघात पुनरागमन करण्यासाठी एक महत्वाचा सल्ला दिला आहे. (IND vs SA Test Series 2019: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 15 सदस्यीय भारतीय संघातून के एल राहुल याला डच्चू, Netizens म्हणाले Happy Retirement)
प्रसाद म्हणाले की, माजी भारतीय फलंदाज व्ही.व्ही. लक्ष्मण (VVS Laxman) याच्या पावलांवर चालून राहुल टीम इंडियामध्ये पुनरागमन करू शकतो. नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडीज दौर्यावर टीम इंडियाने कॅरेबियन संघाला 2-0 ने पराभूत करत चांगली कामगिरी बजावली, पण राहुलने अत्यंत निराशा केली. दोन कसोटी सामन्यांच्या चार डावात राहुल फक्त 101 धावा करू शकला. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टेस्ट मालिकेसाठी संघ जाहीर करताना घोषणा करताना प्रसाद म्हणाले की, राहुल एक प्रतिभावान क्रिकेटपटू आहे, परंतु रेड बॉल क्रिकेटमधील खराब फॉर्ममुळे त्याला आगामी [Poll ID="null" title="undefined"]कसोटी मालिकेसाठी वगळण्यात आले आहे.
प्रसाद यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, “आम्ही राहुलला निश्चितपणे कळविले. तो एक अपवादात्मक कौशल्य आहे आणि दुर्दैवाने त्याचा रेड बॉल क्रिकेटमधील फॉर्म उतरला आहे.”
“जेव्हा लक्ष्मणला भारतीय संघातून वगळण्यात आलं तेव्हा तो पुन्हा घरगुती क्रिकेटमध्ये गेला आणि रणजी करंडक स्पर्धेत 1,400 धावा केल्या आणि त्याने भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवले,” प्रसाद पुढे म्हणाले.
(The above story first appeared on LatestLY on Sep 13, 2019 04:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

