IND vs SL ODI 2021: राहुल द्रविड फक्त ‘इंदिरानगर का गुंडा’ तर संपूर्ण ‘भारताचा गुंडा’, दीपक चाहर असे का म्हणाला जाणून घ्या
दीपक चाहर आणि राहुल द्रविड (Photo Credit: Twitter, YouTube)

IND vs SL ODI 2021: राहुल द्रविड (Rahul Dravid) आयपीएल 2021 दरम्यान ‘इंदिरानगर का गुंडा’ (Indiranagar ka Gunda) या जाहिरातीद्वारे सोशल मीडियावर हिट झाले होते. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून द्रविडने ‘इंदिरानगर का गुंडा’ हे आणखी एक टोपणनाव कमावले आहे. तथापि, जिथपर्यंत दीपक चाहर (Deepak Chahar) याच्यासाठी द्रविड हा संपूर्ण ‘भारताचा गुंडा’ (India ka Gunda) आहे. श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात आपल्या जबरा फलंदाजीने भारतीय संघाला (Indian Team) सामना जिंकून देणारा दीपक चाहर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. चाहरला फलंदाजी क्रमवारीत बढती देण्याची द्रविडची कल्पना होती. श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतल्यावर द्रविड व चाहरचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. एकदिवसीय मालिकेच्या अंतिम सामन्याच्या आदल्या दिवशी पत्रकार परिषदेत आलेल्या चाहरने सर्वांना चकित केले. (IND vs SL 3rd ODI: अखेरच्या वनडे सामन्यात टीम इंडियामध्ये मोठा बदल संभव, ‘या’ खेळाडूंना मिळू शकते संधी; पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन)

व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत दीपकने नव्याने मिळवलेल्या 'इंदिरानगर का गुंडा' या टोपण नावाचा उल्लेख केला आणि राहुल द्रविडला 'इंडिया का गुंडा' म्हणून संबोधले. “राहुल द्रविड सर फक्त इंदिरानगरचा नाही तर संपूर्ण भारताचा गुंडा आहे,” चाहरने गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले आणि लगेच हशा फोडले. द्रविड आजही जगभरातील सर्वात प्रिय आणि आदरणीय क्रिकेटींग सेलिब्रिटींपैकी एक आहे. भारतीय क्रिकेट स्पॅक्ट्रममधील एक प्रतीक, एक खेळाडू म्हणून निवृत्तीनंतर द्रविड प्रशिक्षणाकडे वळले. यापूर्वी त्यांनी भारतीय क्रिकेट संघासह अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे आणि काही वर्षांपासून भारत अ क्रिकेटपटूंसाठी मार्गदर्शक बल आहे. द्रविड ज्येष्ठ भारतीय क्रिकेट संघाचे पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक नसले तरी श्रीलंकन दौर्‍यासाठी त्यांना ही भूमिका देण्यात आली आहे. दुसरीकडे, दुसऱ्या वनडे सामन्यात दीपक चाहरने नाबाद 69 धावांची खेळी करत भारताला सामन्यासह मालिकेत विजय मिळवून दिला. 276 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने एक वेळी 193 धावांवर सात विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर भुवनेश्वर कुमार समवेत चाहारने अर्धशतकी भागीदारी करून टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

कोलंबो येथे पहिला आणि दुसरा एकदिवसीय सामना जिंकणार्‍या भारतीय क्रिकेट संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत आधीच 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेचा तिसरा सामनाही शुक्रवारी याच मैदानावर, आर प्रेमदासा स्टेडियम, खेळला जाईल.