IND vs SA: दुसऱ्या कसोटी सामन्यातून होऊ शकतो पुजाराचा 'पत्ता कट', भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू म्हणाले - ‘त्याला XI मधून बाहेर काढण्यासाठी खेळाडू आहेत’

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू म्हणाला की, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा स्पष्टपणे संघर्ष करत आहे आणि संघात असे खेळाडू आहेत, जे त्याला इलेव्हनमधून बाहेर काढू शकतात. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या डावात पुजारा पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. पुजाराने 2021 मध्ये 14 सामन्यांमध्ये 28.58 च्या सरासरीने सहा अर्धशतकांसह 686 धावा केल्या आहेत.

IND vs SA: दुसऱ्या कसोटी सामन्यातून होऊ शकतो पुजाराचा 'पत्ता कट', भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू म्हणाले - ‘त्याला XI मधून बाहेर काढण्यासाठी खेळाडू आहेत’
चेतेश्वर पुजारा (Photo Credit-PTI)

IND vs SA Test Series: टीम इंडियाचा (Team India) फलंदाज चेतेश्वर पुजाराची (Cheteshwar Pujara) 2021 मधील कसोटी सामन्यांतील खराब कामगिरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) सेंच्युरियनमधील पहिल्या सामन्यात सुरूच राहिली. वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने त्याला गोल्डन डकवर माघारी धाडलं. पुजाराचे या वर्षातील तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. प्लेइंग इलेव्हनमध्ये पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या स्थानावर प्रश्न उपस्थित होत असताना, पहिल्या डावात 48 धावांची खेळी करून रहाणेने समालोचकांची बोलती बंद केली. तथापि, पुजाराचे स्थान पुन्हा एकदा रडारवर आले आहे कारण 33 वर्षीय खेळाडू संघर्ष करत असल्याचे भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू मदन लाल (Madan Lal) यांनी सांगितले. (IND vs SA 1st Test Day 3: टीम इंडियाचा पहिला डाव 327 धावांवर आटोपला; दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांचे दमदार पुनरागमन, Lungi Ngidi च्या खात्यात 6 विकेट)

इंडिया टुडेशी बोलताना लाल म्हणाले, “पुजारा संघर्ष करत आहे. यात दोन मार्ग नाहीत. संघात असे खेळाडू आहेत जे त्याला इलेव्हनमधून बाहेर काढू शकतील. तिसऱ्या क्रमांकावर कर्णधारालाही अशा खेळाडूची गरज आहे जो धरू शकेल. डाव आणि त्याच वेळी काही धावा मिळवा. काही वेळा पुजारा खूप जास्त अडकतो. त्यामुळे स्पष्टपणे, तो संघर्ष करत आहे.” लक्षात घ्यायचे की पुजाराने 2021 मध्ये खेळलेल्या 14 सामन्यांमध्ये 28.58 च्या सरासरीने सहा अर्धशतकांसह 686 धावा केल्या आहेत. पुजारा बराच काळ त्याच्या खराब फॉर्मशी झुंज देत आहे, तरीही संघ व्यवस्थापन आणि कर्णधार त्याच्यावर अथक विश्वास दाखवत आहेत. पण जेव्हा संघात चांगला फॉर्म असलेले युवा फलंदाज उपस्थित असतात, तेव्हा पुजाराबद्दल प्रश्न निर्माण व्हायलाच हवेत. दरम्यान या सामन्याच्या दुसऱ्या डावातही पुजारा फ्लॉप ठरला तर पुढच्या सामन्यात त्याचा प्लेइंग इलेव्हनमधून पत्ता कट होऊ शकतो.

भारतीय कसोटी प्लेइंग इलेव्हनमध्ये पुजाराच्या जागी श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी खेळण्यासाठी प्रमुख दावेदार आहेत. अय्यरने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात शतक आणि अर्धशतकासह चांगली कामगिरी केली, तर विहारीने दक्षिण आफ्रिकेत टीम ‘ए’ कडून खेळताना प्रभावित केले होते. दरम्यान, कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी फलंदाजीने वर्चस्व गाजवल्यावर तिसऱ्या दिवशी पाहुण्या संघाला मोठा धक्का सहन करावा लागला. भारताने पहिल्या दिवशी 272/3 धावसंख्येपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि त्यांचा संपूर्ण संघ 327 धावांवर ऑलआऊट झाला. अशाप्रकारे तिसऱ्या दिवशी फक्त 49 धावांवर टीम इंडियाने 7 गडी गमावले.

(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2021 05:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).