IND vs ENG: भारत-इंग्लंड यांच्यातील रद्द केलेल्या मँचेस्टर टेस्टवर मोठे अपडेट, BCCI च्या ‘या’ प्रस्तावाला ECB ने सहमती दर्शवली

कोरोनामुळे इंग्लंड विरुद्ध भारत दरम्यान रद्द झालेली मँचेस्टर कसोटी सामन्याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. अहवालांनुसार, ईसीबीने पुढील वर्षी टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यावर एक कसोटी सामना खेळण्यास सहमती दर्शवली आहे. बीसीसीआयने ईसीबीला दोन अतिरिक्त टी-20 सामने किंवा एक कसोटी सामना खेळण्याचा प्रस्ताव दिला होता.

IND vs ENG: भारत-इंग्लंड यांच्यातील रद्द केलेल्या मँचेस्टर टेस्टवर मोठे अपडेट, BCCI च्या ‘या’ प्रस्तावाला ECB ने सहमती दर्शवली
जो रूट व विराट कोहली (Photo Credit: Twitter/BCCI)

कोरोनामुळे इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) दरम्यान रद्द झालेली मँचेस्टर कसोटी  (Manchester Test) सामन्याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. अहवालांनुसार, ईसीबीने (ECB)  पुढील वर्षी टीम इंडियाच्या (Team India) इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) एक कसोटी सामना खेळण्यास सहमती दर्शवली आहे. बीसीसीआयने (BCCI) ईसीबीला दोन अतिरिक्त टी-20 सामने किंवा एक कसोटी सामना खेळण्याचा प्रस्ताव दिला होता. टीम इंडियाला पुढील वर्षी इंग्लंड दौऱ्यावर तीन वनडे आणि तितक्याच टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. जुनिअर फिजिओ योगेश परमार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मँचेस्टर येथील मालिकेच्या शेवटच्या कसोटीत टीम इंडियाने मैदानात उतरण्यास नकार दिला होता. त्यानंतर दोन्ही बोर्डांना सामना रद्द करावा लागला होता. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या बातमीनुसार, ईसीबीने बीसीसीआयने एक कसोटी सामना खेळण्याची ऑफर स्वीकारली आहे. (ENG vs IND 5th Test: भारत आणि इंग्लंडमधील कसोटी सामना रद्द झाल्यानंतर BCCI ने केले पहिले विधान, वाचा काय दिली प्रतिक्रिया)

तथापि, दोन्ही मंडळांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही किंवा हा सामना पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा भाग असेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उल्लेखनीय म्हणजे, पाचवा कसोटी सामना रद्द झाल्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाला तोटा सहन करावा लागला होता आणि त्यांनी भरपाईसाठी आयसीसीला पत्रही लिहिले होते. पाचवी कसोटी रद्द झाली त्यावेळी टीम इंडिया मालिकेत 2-1 ने आघाडीवर होती. विराट कोहलीच्या नेतृत्वात लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव केला होता आणि त्यानंतर संघाला लीड्समध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर ‘विराटसेने’ने ओव्हल कसोटीत जबरदस्त खेळ दाखवला आणि 157 धावांनी इंग्लिश संघाला पराभवाची धूळ चारली होती. भारताने यापूर्वी इंग्लंडविरुद्ध 2007 मध्ये इंग्लिश अटींमध्ये शेवटची कसोटी मालिका जिंकली होती. यानंतर, संघाला 2014 आणि 2018 च्या दौऱ्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते.

लक्षात घ्यायचे की इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफचे अनेक सदस्य कोरोना विषाणूच्या कचाट्यात सापडले होते. चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांची चाचणी सकारात्मक आली होती. त्यांच्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि नंतर कनिष्ठ फीडर योगेश परमार यांना आयसोलेट करण्यात आले होते. पाचवी कसोटी रद्द झाल्यानंतर भारतीय संघावर प्रसारमाध्यमांनी आणि इंग्लंडच्या माजी खेळाडूंनी जोरदार टीका केली. काहींनी तर आयपीएल खेळण्यासाठी सामना रद्द झाल्याचा देखील आरोप केला.

(The above story first appeared on LatestLY on Sep 25, 2021 09:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).