IND vs AUS Series: भारत-ऑस्ट्रेलिया संघात रंगणार मजेदार द्वंद्व; जाणून घ्या 2018-19 दौऱ्यावरील टेस्ट मालिकेची 'ही' आकडेवारी
भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: Getty)

भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील द्विपक्षीय मालिका 27 नोव्हेंबर रोजी सुरु होणार आहे. दोन्ही संघात तीन वनडे, टी-20 आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. टीम इंडिया (Team India) आधीपासूनच ऑस्ट्रेलियामध्ये आहे आणि त्यांच्या पहिल्या प्रशिक्षण सत्राचे फोटो शनिवारी समोर आली. दोन क्रिकेट दिग्गज दिग्गज एकमेकांशी भिडतील आणि दोनघे काही ब्लॉकबस्टर मनोरंजनासाठी सज्ज आहेत. अखेरच्या वेळी जेव्हा भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour of Australia) यजमानांना पराभूत करून आणि कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने सर्व विभागात ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवले कांगारुंना पराभूत केले. या दौर्‍याचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय गोलंदाजांनी त्यांच्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना गुणवत्तेत मागे टाकले. (India vs Australia 2020-21: सिडनीमध्ये भारतीय क्रिकेट टीमच्या हॉटेलपासून 30 किमी अंतरावर विमानाचा अपघात; खेळाडूंनी मुश्किलीने वाचवला जीव)

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना अ‍ॅडिलेड येथे खेळला जाईल जो की गुलाबी चेंडूने खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा पहिला डे/नाईट कसोटी सामना असेल. चला तर मग भारताच्या डाऊन अंडर 2018-19 मालिकेच्या प्रमुख फलंदाजी आणि गोलंदाजीची आकडेवारीवर एकदा नजर टाकूया.

1. भारतासाठी चेतेश्वर पुजाराने चार सामन्यात 521 धावा केल्या. मालिकेत दुसऱ्या सर्वाधिक धावा करणाऱ्या रिषभ पंत आणि पुजाराच्या धावांमध फक्त 171 धावांचे अंतर होते. विराट कोहलीने 282 धावा जमविल्या, तर उपकर्णधार अजिंक्य रहाणेने एकूण 217 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस हॅरिसने सर्वाधिक 258 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने दुसऱ्या सर्वाधिक 237 धावा केल्या.

2. जसप्रीत बुमराहने भारताच्या वेगवान हल्ल्याचे नेतृत्व केले आणि ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनसह मालिकेत सर्वाधिक 21 विकेट घेतल्या. मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा यांनी अनुक्रमे 16 आणि 11 ऑस्ट्रेलियन विकेट्स काढल्या, तर फिरकी विभागात रविंद्र जडेजाने त्याच्या 2 सामन्यांमधून 7 गडी बाद केले. या दौर्‍यात खेळलेल्या एका सामन्यात रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यांना अनुक्रमे 6 आणि 5 विकेट्स मिळाल्या. दुसरीकडे, लायन ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. पॅट कमिन्स, जोश हेझवुड आणि मिचेल स्टार्क यांनी अनुक्रमे 14, 13 आणि 13 विकेट घेतल्या. एकूणच भारतीय गोलंदाज कसोटी मालिकेत 70 विकेट मिळविण्यास यशस्वी ठरले तर ऑस्ट्रेलिया 60 गडीच बाद करु शकले.

3. चेतेश्वर पुजाराने तब्बल 3 शतके ठोकली, जी या दौर्‍यावरील कोणत्याही फलंदाजाने केलेले सर्वाधिक आहेत. 2018-19 दौर्‍यादरम्यान कोणत्याही फलंदाजाने केलेल्या वैयक्तिक धावा देखील पुजाराच्या बॅटमधून आल्या. त्याने सिडनी येथे झालेल्या अंतिम कसोटी सामन्यात 197 धावा केल्या.

4. स्वाभाविकच टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला सर्व मागे टाकले. सिडनीमध्ये भारताचा 622/7 डाव घोषित केला आणि 443/7d हे मालिकेतील दोन सर्वात मोठे डाव होते. पर्थ येथे ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक धावसंख्या 326 नोंदवली.

5. पॅट कमिन्सने 27 धावा देऊन 6 विकेट्स आणि जसप्रीत बुमराहने 33 धावा देऊन 6 विकेट्स काढल्या आणि भारताच्या 2018-19 ऐतिहासतीक ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरील सर्वात यशस्वी गोलंदाजीची नोंद केली.