पाकिस्तानचे माजी कर्णधार इंजमाम उल हक यांनी भारतीय फलंदाजांवर लगावले गंभीर आरोप, वाचा सविस्तर

पाकिस्तानचे माजी कर्णधार इंजमाम उल हकने भारतीय खेळाडूंवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की त्यांच्या काळात भारतीय खेळाडू बहुधा स्वतः खेळत असत आणि म्हणूनच त्यांना पराभवाला सामोरे जावे लागायचे. राजाच्या युट्यूब वाहिनीशी झालेल्या संभाषणात इंझमाम यांनी आपल्या कर्णधारपदाचा काळ सांगितला.

पाकिस्तानचे माजी कर्णधार इंजमाम उल हक यांनी भारतीय फलंदाजांवर लगावले गंभीर आरोप, वाचा सविस्तर
इंजमाम उल हक (Photo Credit: Getty)

पाकिस्तानचे (Pakistan) माजी कर्णधार इंजमाम उल हक (Inzamam-ul-Haq) यांच्या काळात पाकिस्तान क्रिकेट संघाने भारताविरुद्ध (India) चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले होते. अलीकडच्या काळात भारताविरुद्ध पाकिस्तानची नोंद चांगली राहिलेली नाही. पाकिस्तानी खेळाडू भारताविरुद्ध संघर्ष करताना दिसले. आता इंजमामने भारतीय खेळाडूंवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की त्यांच्या काळात भारतीय खेळाडू बहुधा स्वतः खेळत असत आणि म्हणूनच त्यांना पराभवाला सामोरे जावे लागायचे. राजाच्या युट्यूब वाहिनीशी झालेल्या संभाषणात इंझमाम यांनी आपल्या कर्णधारपदाचा काळ सांगितला. रमीज राजा (Ramiz Raja) यांच्या यूट्यूब शो दरम्यान इंजमाम म्हणाले की “जेव्हा आम्ही भारताविरुद्ध खेळलो तेव्हा त्यांची फलंदाजी कागदावरच्या आमच्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान होती. आमच्या फलंदाजांनी 30 किंवा 40 धावा केल्या, ते संघासाठी होते, पण भारतासाठी जरी त्यांनी 100 धावा केल्या, तरी ते स्वतःच खेळले." (पाकिस्तानचे माजी फलंदाज बासित अली यांनी केला खुलासा, इमरान खान यांच्यावर जावेद मियांदाद यांना टीममधून बाहेर काढण्याचा केला आरोप)

इंजमामच्या नेतृत्वाच्या काळात भारताविरूद्ध पाकिस्तानने चांगली कामगिरी बजावली होती यात शंका नाही. त्याविषयी बोलताना इंझमाम म्हणाले की त्यावेळी भारतीची फलंदाजी आमच्यापेक्षा चांगली होती, परंतु आमच्या फलंदाजांनी नेहमीच संघासाठी योगदान दिले. आणि हेच कारण आहे की त्याच्या नेतृत्वात पाकिस्तानने भारताला नियमितपणे पराभूत केले. “तर, दोन्ही बाजूंमध्ये हाच फरक होता,” ते पुढे म्हणाले. 1991 ते 2007 दरम्यान 120 कसोटी, 378 वनडे आणि एक टी-20 मध्ये राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणारे इंजमाम अशा वेळी खेळले जेव्हा पाकिस्तानने क्रिकेटच्या मैदानावर भारतावर वर्चस्व गाजवले.

या चॅट शो दरम्यान इंजमामने माजी कर्णधार इमरान खान यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, जरी तो तांत्रिक कर्णधार नसला तरी त्याने खेळाडूंना बरीच साथ दिली आहे आणि म्हणूनच त्यांचा संघातही आदर होता. 1992 मध्ये इमरान यांच्या नेतृत्वात पाकिस्तानने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला. या चॅट शोमध्ये इंझमामने सांगितले की 1992 वर्ल्ड कपमध्ये तो चांगली कामगिरी करू शकत नव्हता, परंतु इमरान सुरुवातीपासूनच सांगत होता की इंजीने धावा केल्यास आम्ही विश्वचषक जिंकू. या चॅट शोमध्ये इंजमाम म्हणाले की, इमरान भाईने एक-दोनमालिका खराब खेळल्यामुळे कोणत्याही खेळाडूला संघातून बाहेर काढले नाही. तो खेळाडूंना पूर्ण संधी देत असे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2020 01:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).