Rohit Sharma इंग्लंडमध्ये ‘या’ कारणामुळे ठरतोय ‘हिट’, विराट कोहलीने घ्यायला पाहिजे धडा; माजी भारतीय क्रिकेटपटूने केला खुलासा

भारतीय सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा इंग्लंडविरुद्ध पहिल्या तीन कसोटी सामन्यात धावा काढण्यात यशस्वी झाला आहे. रोहितने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यात 46 च्या सरासरीने 230 धावा केल्या आहेत आणि या मालिकेत तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोपडा यांनी इंग्लंडमध्ये रोहित शर्माच्या यशस्वी होण्यास कारण स्पष्ट केले आहे.

Rohit Sharma इंग्लंडमध्ये ‘या’ कारणामुळे ठरतोय ‘हिट’, विराट कोहलीने घ्यायला पाहिजे धडा; माजी भारतीय क्रिकेटपटूने केला खुलासा
रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IND vs ENG Series 2021: भारतीय (India) सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) इंग्लंडविरुद्ध (England) पहिल्या तीन कसोटी सामन्यात धावा काढण्यात यशस्वी झाला आहे. रोहित जरी एक मोठा डाव खेळू शकला नसला तरी विराट कोहली (Virat Kohli), रिषभ पंत, अजिंक्य रहाणे यांसारखे मधल्या फळीतील तडाखेबाज संघर्ष करत असल्याने तो धावा काढण्यासाठी तितका संघर्ष करत नाही आहे. रोहितने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यात 46 च्या सरासरीने 230 धावा केल्या आहेत आणि या मालिकेत तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोपडा (Aakash Chopra) यांनी इंग्लंडमध्ये रोहित शर्माच्या यशस्वी होण्यास कारण स्पष्ट केले आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना आकाश म्हणाले की, “रोहितने त्याच्या फलंदाजीत मोठा बदल केला आहे आणि तो सतत स्वतःला आठवण करून देतो की, तो चेंडू त्याच्या शरीराच्या जवळ खेळेल आणि अत्यंत सावधगिरीने खेळेल आणि पिच-अप बॉल मारण्याचा प्रयत्न करणार नाही. त्याने इंग्लिश स्थितीत स्वतःला चमकदारपणे समायोजित केले आहे आणि यामुळे तो यशस्वी होत आहे.” (IND vs ENG 4th Test: चौथ्या टेस्ट सामन्यापूर्वी नसीर हुसेन यांनी इंग्लंडला दिली चेतावणी, म्हणाले- ‘भारताला कमी लेखू नका, ही मालिका विसरू नका’)

भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत शर्माच्या फलंदाजीने केलेल्या कमबॅकचे विश्लेषण करताना, भारताच्या माजी सलामीवीराने शर्माची एक नवीन सवय लावण्यासाठी आणि मोठ्या कार्यक्षमतेने त्याची अंमलबजावणी केल्याबद्दल प्रशंसा केली. आकाश चोपडा म्हणाले की “एक महान खेळाडू होण्यासाठी अनेक भिन्न पैलू आहेत. पहिले, तुम्ही किती दिवस पुढे जातात, म्हणजे तुम्ही किती दिवस क्रिकेट खेळू शकता. दुसरे म्हणजे, तुमची आकडेवारी किती चांगली आहे आणि तिसरे म्हणजे तुम्ही तुमच्या खेळाद्वारे किती लोकांना प्रेरणा देऊ शकता. उत्कृष्ट खेळाडू होण्यासाठी परिस्थितीशी जुळवून घेणे देखील महत्त्वाचे आहे. जर तुम्ही कोणत्याही महान खेळाडूकडे पाहिले तर त्यांनी स्वतःला परिस्थितीशी जुळवून घेतले आणि धावा केल्या.” तिसऱ्या कसोटीत भारताला हेडिंग्ले येथे एक डाव आणि 76 धावांनी पराभूत व्हावे लागले.

सलामीला येण्याची जबाबदारी मिळाल्यापासून रोहित भारताचा स्टार कसोटी फलंदाजांपैकी एक बनला आहे. तसेच इंग्लंडविरुद्ध आता 5 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. जो रूटचा ब्रिटिश संघ आणि विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारत 2 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी केनिंग्टन ओव्हलकडे रवाना होईल.

(The above story first appeared on LatestLY on Aug 31, 2021 06:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).