IPL 2021: राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात 2 धावांनी हरल्याने कर्णधार के एल राहुल नाराज, दिली 'अशी' प्रतिक्रिया
केएल राहुल (Photo Credit: PTI)

मंगळवारी राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध खेळलेल्या सामन्यात पंजाब किंग्सला (PBKS) दोन धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुल (Captain KL Rahul) संघाच्या पराभवामुळे खूप निराश झाला आहे. राहुल म्हणाला की, चांगल्या स्थितीत असूनही हा पराभव पचवणे खूप कठीण आहे.  पंजाबच्या संघाला शेवटच्या षटकात फक्त चार धावांची गरज होती आणि त्याच्या हातात आठ विकेट्स होत्या. पंजाब किंग्सने (Punjab Kings) शेवटच्या षटकात दोन विकेट गमावल्या एवढेच नाही तर संघाला फक्त एक धाव मिळवता आली. राहुलचा असा विश्वास आहे की संघाने मागील चुकांमधून धडा घेतला नाही. यासह राहुल म्हणाला की संघाने दबावाखाली अधिक चांगले करणे आवश्यक आहे.  कर्णधार राहुल म्हणाला, हा पराभव पचवणे कठीण आहे. आपल्याला दबावाला अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जावे लागेल. हा पराभव पचवणे कठीण आहे कारण आपण आपल्या मागील चुकांमधून धडा घेतलेला नाही.

रॉयल्सच्या 186 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्स 20 षटकांत चार गडी गमावून केवळ 183 धावा करू शकला, मयंक अग्रवालच्या 67 आणि राहुलच्या 49 धावांमुळे. पूरन आणि एडन मार्क्राम नाबाद 26 खेळी करत यांनी तिसऱ्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी करत पंजाबला विजयाच्या उंबरठ्यावर नेले पण त्यांना विजय मिळवता आला नाही.
शेवटच्या षटकातही पंजाब किंग्सला विजयासाठी फक्त चार धावांची गरज होती.  कार्तिक त्यागीने आपल्या शानदार गोलंदाजीद्वारे दोन विकेट्स तर घेतल्याच पण 6 चेंडूत फक्त एक धाव खर्च केली. कार्तिक त्यागीने शेवटच्या षटकात एकापेक्षा जास्त यॉर्कर टाकून संघाला विजय मिळवून दिला. सामनावीराचा पुरस्कार कार्तिक त्यागीला देण्यात आला. राजस्थान रॉयल्सने युवा फलंदाजांच्या यशवी जयस्वालच्या शानदार चेंडूमुळे 36 चेंडूत 49 आणि महिपाल लोमरोरने 17 चेंडूत 43 धावा केल्यामुळे 20 षटकांत 185 धावा केल्या.