IND vs NAM, T20 World Cup 2021: नामिबियाविरुद्ध सामन्यात ‘या’ कारणामुळे टीम इंडिया दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरली
आज आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 मधील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाची टक्कर नामिबियाशी आहे. या सामन्यात भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला तेव्हा सर्व खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक तारक सिन्हा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय खेळाडूंनी ही काळी पट्टी बांधली आहे.
आज आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 मधील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाची (Team India) टक्कर नामिबियाशी (Namibia) आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ (Indian Team) क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला तेव्हा सर्व खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. देशाला अनेक महान खेळाडू देणारे प्रशिक्षक तारक सिन्हा (Tarak Sinha) यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय खेळाडूंनी ही काळी पट्टी बांधली आहे. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक सिन्हा यांचे शनिवारी निधन झाले.
#TeamIndia is wearing black armbands today to pay their tributes to Dronacharya Awardee and widely respected coach Shri Tarak Sinha, who sadly passed away on Saturday.#T20WorldCup #INDvNAM pic.twitter.com/U2LHEtsuN9
— BCCI (@BCCI) November 8, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 08, 2021 08:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

