मुंबईमध्ये विविध परिसरातील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दिशेने बीएमसी काम करत असते. अशात मुंबई-मीरा भाईंदर कनेक्टिव्हिटीची गरज वाढली आहे. ही गोष्ट ध्यानात घेऊन सध्याचा दहिसर लिंक रोडपासून भाईंदरपर्यंत प्रस्तावित 6 किमी लांबीचा व 45 मीटर रुंदीचा रस्ता बीएमसी बांधणार आहे. यातील 1.5 किमी मार्ग एमसीजीएममध्ये, तर 4.5 किमी मार्ग मीरा भाईंदर कॉर्पोरेशनमध्ये असेल. मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही माहिती दिली.

हा प्रस्तावित उत्तरेकडील किनारपट्टीच्या रस्त्याचा एक भाग आहे, परंतु हा अत्यावश्यक असल्याने या रस्त्याचे बांधकाम युद्धपातळीवर होईल. दहिसर पश्चिम ते भाईंदर या कनेक्टिव्हिटीमुळे दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होईल तसेच दहिसर पूर्व आणि WEH वरील रहदारी आणि दबाव कमी होईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)