दिल्ली: CAB मंजूर झाल्यानंतर पाकिस्तानमधून भारतात दाखल झालेल्या कुटुंबाने साजरा केला आनंदोत्सव; लेकीचं नाव ठेवलं 'नागरिकता'!

नागरिकत्व विधेयक मंजूर झाल्याच्या आनंदामध्ये दिल्लीत पाकिस्तानामधून आलेल्या हिंदू कुटुंबाने लेकीचं नाव ठेवलं नागरिकता

दिल्ली: CAB मंजूर झाल्यानंतर पाकिस्तानमधून भारतात दाखल झालेल्या कुटुंबाने साजरा केला आनंदोत्सव; लेकीचं नाव ठेवलं 'नागरिकता'!
Baby Nagrikta | Photo Credits: Twiiter @sssingh21

भारताच्या संसदेमध्ये काल (11 डिसेंबर) रात्री नागरिकत्व सुधारणा विधेयक (Citizenship Amendment Bill) मंजूर झाल्यानंतर देशात संमिश्र प्रतिसाद मिळत आहेत. एकीकडे ईशान्य भारत धुमसत आहे. पण दिल्लीतील मजनू का टीला परिसरामध्ये पाकिस्तानामधून आलेल्या हिंदू कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या मंजूरीनंतर आनंदीत झालेल्या कुटुंबाने त्यांच्या घरातील चिमुकलीचं नाव 'नागरिकता' (Nagrikta) असं ठेवलं आहे. लोकसभेमध्ये विधेयक मंजूर झाल्यानंतर हे नाव ठेवण्यात आलं आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात आयपीएस अधिकारी अब्दुर रहमान यांचा राजीनामा

 2012 साली 'नागरिकता' चे कुटुंब पाकिस्तानमधून दिल्लीमध्ये वास्तव्यास आले. मागील 7 वर्षांपासून हे कुटुंब विधेयक मंजूर होण्याच्या प्रतिक्षेत होते. मात्र आता संसदेमध्ये मंजूर झालेलं विधेयक आनंददायी असल्याची माहिती दिली आहे.वृत्त संस्थेशी बोलताना 'नागरिकता' ची आजी मीरा दासने (वय 40) दिलेल्या माहितीनुसार, तिच्या जन्माच्या वेळेस सगळीकडे नागरिकतेबद्दल चर्चा सुरू होती त्यामुळे तिचं नावदेखील 'नागरिकता' ठेवल्याचं त्यांनी म्हटलं होतं. नागरिकत्त्व सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर ईशान्य भारतामध्ये तणावाची स्थिती; इंटरनेट बंद, कर्फ्यू लागू तर विमानसेवा बंद!

मजनू का टीला भागात राहणार्‍या अनेक शरणार्थींनी विधेयक मंजूर झाल्यानंतर फटाके वाजवून, मिठाई वाटप केलं. दरम्यान सध्या हे विधेयक मंजूर झाल्यानंतर ईशान्य भारतामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. कर्फ्यू लावण्यात आला आहे तर तणावाग्रस्त स्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून लष्कर तैनात करण्यात आलं आहे.

(The above story first appeared on LatestLY on Dec 12, 2019 03:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).