Nitin Gadkari (Photo Credit - ANI/Twitter)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सोमवारी सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील उसाचे उत्पादन वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली. असेच उत्पन्न राहिल्यास असा दिवस येईल की आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, असे ते म्हणाले. सोलापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या पायाभरणी समारंभात गडकरी बोलत होते. एकेकाळी दुष्काळी जिल्हा असलेल्या सोलापूरमध्ये जलसंधारणासाठी उचललेली पावले पाहून आनंद झाल्याचे ते म्हणाले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले, “या कामामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली आहे, ज्यामुळे शेती आणि पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता सुधारली आहे. तथापि, या क्षेत्रात करण्यासारखे बरेच काही आहे.”

Tweet

ते म्हणाले, “स्थानिक नेते बबनदादा शिंदे यांनी मला सांगितले की 22 लाख ऊस नष्ट झाला आहे. जिल्ह्यात अशाप्रकारे पिके उद्ध्वस्त होत असतील, तर माझे शब्द लक्षात ठेवा की, ऊस उत्पादन असेच सुरू राहिल्यास असा दिवा येईल, जेव्हा आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही.