Mumbai Roads: मुंबईकरांना दिलासा! शहरातील सर्व रस्ते पावसाळ्यापूर्वी वाहतुकीसाठी योग्य करण्याचे BMC चे आदेश; 31 मे निश्चित केली अंतिम तारीख

मंगळवारी बीएमसीने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 74 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अर्थसंकल्प सादर केला, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त आणि प्रशासन भूषण गगराणी यांनी सादर केला. बीएमसीचे आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिला अर्थसंकल्प आहे.

Mumbai Roads: मुंबईकरांना दिलासा! शहरातील सर्व रस्ते पावसाळ्यापूर्वी वाहतुकीसाठी योग्य करण्याचे BMC चे आदेश; 31 मे निश्चित केली अंतिम तारीख
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: Twitter/bhatia_niraj23)

पावसाळ्यातील मुंबईमधील रस्त्यांची (Mumbai Roads) स्थिती सर्वश्रुत आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे रस्त्यांवर पाणी तुंबते, खड्डे वाढतात आणि वाहतूक कोंडी निर्माण होते व ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. मुंबईतील नागरिकांना पावसाळ्यात रस्त्यांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. आता पावसाळ्याला अजून काही महिने शिल्लक असताना, प्रशासनाने शहरातील रस्त्यांबाबत उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. बीएमसीने सध्याची रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी 31 मे ही अंतिम मुदत निश्चित केली आहे.

मंगळवारी बीएमसीने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 74 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अर्थसंकल्प सादर केला, जो आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त आणि प्रशासन भूषण गगराणी यांनी सादर केला. बीएमसीचे आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिला अर्थसंकल्प आहे.

आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात, बीएमसी प्रमुख म्हणाले, ‘मुंबई महानगरपालिकेने यावर्षी सर्वात मोठे बजेट सादर केले आहे आणि ते मुंबईकरांच्या मागण्या आणि अपेक्षा प्रतिबिंबित करते. आम्ही आमच्या नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करू. शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या कामांमुळे गैरसोय होत आहे आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे, अशा तक्रारी येत आहेत. या तक्रारींची दखल घेत गगराणी म्हणाले की, शहरातील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरणा करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट असले तरी, विद्यमान कामे पूर्ण होईपर्यंत कंत्राटदारांना कोणतेही नवीन रस्ते खोदण्याचे निर्देश देण्यात आले नाहीत. पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊ शकणाऱ्या रस्त्यांचे काम हाती घेतले जाईल. (हेही वाचा: Union Budget 2025: मेट्रो प्रकल्पाला मिळणार गती; केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबई मेट्रोला 1,255 कोटी रुपयांचा निधी)

गगराणी म्हणाले की, सर्व महापालिका अधिकारी आणि कंत्राटदारांना ज्या रस्त्यांवर कामे सुरू आहेत ते पावसाळ्यापूर्वी वाहतुकीसाठी योग्य होतील, याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बीएमसीने सध्याची रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी 31 मे ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. रस्ते काँक्रिटीकरणाच्या प्रकल्पाविषयी बोलताना आयुक्त म्हणाले की, मुंबईतील सर्व रस्ते काँक्रिटीकरण करण्याचे बीएमसीचे उद्दिष्ट असले तरी, सध्या चांगल्या स्थितीत असलेल्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण न करण्याबाबत रहिवाशांनी आक्षेप घेतले आहेत. जर एखाद्या विशिष्ट परिसरात रस्त्याचे काँक्रिटीकरण न करण्याच्या मागणीवर रहिवाशांनी असे प्रस्ताव सादर केले तर त्या प्रस्तावाचा विचार केला जाईल.

पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीची समस्या आणि इतर प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी आणि शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी बीएमसी एमएसआरडीसी, एमएमआरडीए इत्यादी इतर एजन्सींसोबत काम करत असल्याचेही गगराणी म्हणाले. बीएमसीने आर्थिक वर्ष 25-26 च्या शहराच्या अर्थसंकल्पासाठी नागरिकांच्या सूचना आणि अपेक्षा मागवल्या होत्या आणि नागरी संस्थेला नागरिकांकडून 2238 सूचना मिळाल्या, ज्यांची दखल घेण्यात आली आहे आणि अर्थसंकल्पात त्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).