Maharashtra Rain Forecast: राज्यात 9 सप्टेंबर पासून पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता- IMD
मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. मुंबई आणि उपनगरांसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, विदर्भाच धुव्वाधार पाऊस बरसत आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबई (Mumbai) आणि उपनगरांसह मध्य महाराष्ट्र (Madhy Maharashtra), मराठवाडा (Marathwada), कोकण (Konkan), विदर्भात (Vidharbha) धुव्वाधार पाऊस होत आहे. पुढच्या 48 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. गणपती आगमनाला काही दिवस बाकी असताना होणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिक चिंतातूर झाले आहे. मात्र 9 सप्टेंबर पासून राज्यात पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस. होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. यामुळे बाप्पाच्या आगमनात कोणतीही अडचण नसेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
तसंच पुढील 2-3 दिवसांसाठी हवामानाचे इशारेही देण्यात आले आहेत. 8 सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट असून पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 9 सष्टेंबर रोजी ठाणे, पालघर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. तर 10 सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरीसाठी येल्लो अलर्ट आहे. 11 सप्टेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग साठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
K S Hosalikar Tweets:
गणपती बाप्पा मोरया🌸 & Weather:
राज्यात सध्या असलेला जोरदार पावसाच्या सिस्टिमची, 9 सप्टेंबर पासून तिव्रता कमी होण्याची शक्यता IMD ने आज वर्तवली आहे.त्यामुळे गणेश चतुर्थीला,बाप्पाच्या आगमनासाठी,भावीकांना अडचण नसेल.अधिक माहितीसाठी हवामान विभागाची वेबसाईट पहा@CMOMaharashtra pic.twitter.com/ZRYovBgSfD
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 7, 2021
IMD ने आज राज्यासाठी पुढच्या 2,3 दिवसासाठी हवामानासाठीचे इशारे दिले आहेत.पुढच्या 48 तासात; कोकणात,मध्य महाराष्ट्र,मराठवाड्याचा काही भागात मुसळधार ते अतीमुसळधार,तर कोकणात काही ठिकाणी अतीवृष्टीची पण शक्यता. अधिक माहितीसाठी हवामान विभागाची वेबसाईट पहा.काळजी घ्या,अध्यावत माहीती घ्या. pic.twitter.com/RdpJeHWEBk
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 7, 2021
राज्यात मागील काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 07, 2021 09:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

