भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात एकही पायाभूत काम केलेले नाही असा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच त्यांनी, "देवेंद्र फडणवीस यांच्या नाकर्तेपणामुळे जनतेने भाजपला बहुमत नाकारले," असाही टोला फडणवीसांना लगावला.
Maharashtra Government Formation Live News Updates: 'देवेंद्र फडणवीस यांच्या नाकर्तेपणामुळे जनतेने भाजपला बहुमत नाकारले,' पृथ्वीराज चव्हाण यांनी केली टीका


उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि अमित शाह यांच्यावर केलेल्या आरोपांचा उत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. ते म्हणाले, "भाजप पक्षाचा सत्तेवर नाही तर सत्यावर विश्वास आहे." तसेच उद्धव ठाकरे यांनी मांडलेले सर्व मुद्दे त्यांनी फेटाळून लावले. फक्त शिवसेनेच्या भूमिकेमुळेच महाराष्ट्राची जनता वेठीस आहे असंही ते म्हणाले

संजय राऊत यांनी थोड्या वेळापूर्वी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. आणि आता उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर राजकीय वर्तुळात वेगवान हालचाली पाहायला मिळत आहेत. काँग्रेस पक्षाचे बडे नेते आता शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचत आहेत. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात सिल्वर ओक च्या दिशेने.

शिवसेना पक्षाच्या आमदारांना रंगशारदा मधून दुसरीकडे हलवण्यात येत आहे. पण हे आमदार कुठे जात आहेत याबद्दल उद्धव ठाकरे यांना विचारला असता त्यांनी, "आम्ही आमचे आमदार कुठेही नेऊ," असं उत्तर दिलं आहे.

राम मंदिराच्या निकालावरही उद्धव ठाकरे यांनी आपलं मत मांडलं. ते म्हणाले, "राम मंदिराचा निकाल हा न्यायलयाकडून आलेला निकाल, सरकारचा काहीही संबंध नाही." तसेच, "खोटं बोलणारी लोकं कोणत्या तोंडाने रामाची पूजा करणार आहेत?" असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

देवेंद्र फडणवीस यांचे कॉल न उचलण्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, "हो मी देवेंद्र फडणवीसांशी बोललो नाही. कारण मला खोटं पाडणाऱ्या माणसाशी मी बोलणार नाही." तसेच, "खोटं बोलणं कुठल्या हिंदुत्वात बसतं, RSS ने सांगावं, " असा सवालही त्यांनी विचारला.

"शिवसेनाप्रमुखांच्या कुटुंबावर, माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला आहे. पण अमित शहा आणि कंपनीने कितीही खोटारडेपणाचे आरोप केले तरी जनतेला खोटारडेपणा कोण करतो माहित आहे," असे खडे बोल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत लगावले. इतकाच नव्हे तर "अमित शहांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपद आणि समसमान फॉर्म्युला ठरला होता," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात. त्यांनी सर्वप्रथम देवेंदनरा फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री असं संबोधलं आणि त्यांना धन्यवाद असं म्हणाले.

"शिवसेना चुकत आहे असं मला वाटतं कारण अमित शहा म्हणाले आहेत की अडीच वर्षाचा फक्त विषय निघाला होता निर्णय झाला नव्हता" असं नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

आम्ही ठरवलं तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राज्यात सत्ता स्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तसेच पुढील राजकीय रणनिती काय असेल याबाबत उद्धव ठाकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत.


महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी पुढील पर्याय समोर येईपर्यंत देवेंद्र फडणवीस हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहे.

नरेंद्र मोदी यांच्या विरूद्ध करण्यात आलेली टीका आमच्या मनाला लागली असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान दैनिक सामना प्रमाणेच इतरत्र टीका करणं चूकीचं असल्याचं सांगत संजय राऊत यांच्या वक्तव्यांचा खरमरीत शब्दामध्ये समाचार घेतला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये चर्चा शिवसेनेकडून थांबवण्यात आल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेकडून दरी वाढवण्याचं काम केलं आहे. संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आली आहेत. आम्ही जोडणारी लोकं आहोत तोडणारी नाही असेही त्यांंनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांची मतदान निकालानंतर पत्रकार परिषद धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. तर अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर निर्णय झाला नव्हता. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच चर्चेतून विषय संपवणं शक्य होतं मात्र चर्चा शिवसेनेने थांबवली आहेत.

महाराष्ट्राच्या जनतेचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आभार मानले आहेत. राज्यपालांना राजीनामा सुपूर्त केल्यानंतर त्यांनी तो स्वीकारल्याचं म्हटलं आहे. तसेच दुष्काळ, अतिवृष्टी सारख्या समस्यांमध्ये शेतकर्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सोपवला. भाजपाच्या मंत्र्यांसोबत आज फडणवीस राजभवनावर पोहचले आणि त्यांनी राजीनामा दिला.
Mumbai: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and other state ministers meet Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhawan. pic.twitter.com/grmCMrHLg9
— ANI (@ANI) November 8, 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भेटीला राजभवनावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत काही भाजप मंत्री उपस्थित आहेत. दरम्यान आज मुख्यमंत्री राजीनामा देण्याची शक्यता आहे. फडणवीस यांच्या सोबत मंत्रीमंडळातील नेते देखील आपला राजीनामा देणार आहेत.
Mumbai: Shiv Sena leader Sanjay Raut arrives at NCP Chief Sharad Pawar's residence pic.twitter.com/xGIAdcigiu
— ANI (@ANI) November 8, 2019

शिवसेना आमदारांची हॉटेल रंगशारदा वरून आता मालाडच्या रिट्रीट हॉटेलमध्ये हलवण्यात आलं आहे. आज यापार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकर यांनी 8-15 नोव्हेंबर दरम्यान आमदारांना संरक्षण द्या या आशयाचं पत्र देण्यात आलं आहे.

संजय राऊत मागील 15 दिवसात 3-4 वेळेस शरद पवार यांच्या भेटीला येणार आहेत. आता सत्ता कोंडी फोडण्यासाठी शरद पवार यांच्या भेटीला संजय राऊत आले आहेत. काही वेळापूर्वी महायुतीमधील रामदास आठवले भेटीला आले आहेत. शिवसेना-भाजप यांच्यातील तिढा सोडविण्यासाठी रामदास आठवले-शरद पवार यांच्यात चर्चा; घेतली संयुक्त पत्रकार परिषद.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'सह्याद्री' वर पत्रकार परिषद घेणार आहेत. संध्याकाळी 4.30 वाजता देवेंद्र फडणवीस काय बोलणार? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. तर भाजप नेते आशिष शेलार राजभवनावर दाखल झाले आहेत. भाजपा- शिवसेना यांच्यामधील ताण हलका होणार का? हे पहाणं आता उत्सुकतेचं ठरलं आहे.

-उद्धव ठाकरे 5 वाजता रंगशारदा येथे मध्ये आमदारांसोबत भेटण्यासाठी जाणार आहेत. तसेच भाजप-शिवसेनेमधील कोंडी फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
-अधिकार आणि वाटपावर तोडगा निघण्याची शक्यता करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

- विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपत असला तरीही अद्याप राज्यात सत्ता स्थापन झालेली नाही. याच पार्श्वभुमीवर राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार - रामदास आठवले यांची 'सिल्वर ओक' वर भेट झाली आहे. यावेळेस राजकीय कोंडी फोडण्यासाठी शरद पवार यांचा सल्ला घेण्यासाठी रामदास आठवले पोहचले आहेत. तर शरद पवार यांनी महायुतीला जनतेचा कौल असल्याने त्यांनी सरकार स्थापन करून स्थिर सरकार द्यावंं अशी इच्छा व्यक्त केली आहे.

सत्ता संघर्ष शिगेला असताना आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता शरद पवार यांच्या भेटीला रिपाईचे रामदास आठवले पोहचले आहेत.

कॉंग्रेस आणि शिवसेनेकडून भाजपा पैशांचं आमीष दाखवत आमदार फोडण्याचा प्रयत्न करत आहे. असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला होता. मात्र हे आरोप सुधीर मुनगंटीवर यांनी फेटाळले आहेत. त्यामुळे स्वतःच्या आमदारांवर विश्वास नसल्याने हे वक्तव्यकेल्याचं सांगत 48 तासात पुरावे द्या अन्यथा जनतेची माफी मागा असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. महाराष्ट्रात सत्तास्थापनापूर्वी आजचा दिवस महत्वाचा, भाजप-शिवसेना यांच्यामधील वाद बाजूला पण राज्यपालांकडे लक्ष.

वांद्रे येथील रंगशारदा हॉटेलसमोर 2 बस दाखल झाल्या आहेत. 40 आमदार आतमध्ये असून त्यांनी दुसरीकडे हलवण्याची शक्यता आहे. सध्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे. दगाफटका टाळण्यासाठी मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष शिगेला पोहचला असताना आता राज्यात राजकीय घडामोडीला वेग आला आहे. उद्धव ठाकरे आज शिवसेना भवनावर दाखल झाले असून आमदार, खासदार यांच्यासह जिल्हाप्रमुख देखील हजर आहेत. शिवसेना महायुतीसाठी मुख्यमंत्रीपदावर आग्रही आहे.

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपण्यासाठी आता काही तासांचा अवधी उरला आहे. अशातच आता उद्धव ठाकरे आज जिल्हाप्रमुखांची 'शिवसेना भवानावर भेट घेणार आहेत. तर शरद पवार 'सिल्वर ओक'वर पोहचले आहेत.

शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला 'वर्षा' बंगल्यावर पोहचले आहेत. यापूर्वी भिडे गुरूजींनी काल 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता.

महाराष्ट्रात सत्ता संघर्ष शिगेला असताना घोडाबाजार सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. मीडीयाशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी 25-50 कोटींची ऑफर देऊन फोडाफोडीचे राजकारण सुरू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवसेना आणि कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांना ही ऑफर आली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबई मध्ये दाखल; शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता. राजकीय कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न सुरू. वर्षा बंगल्यावर आज भाजपा नेत्यांची बैठक होणार आहे.

महाराष्ट्रात सत्ता कोंडी फोडण्यासाठी राजकीय हालचालींना वेग; 'वर्षा'वर पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव उपस्थित राहणार असणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील महत्त्वाच्या भेटी होण्याची शक्यता आहे.

आदित्य ठाकरे रात्री उशिरा रंगशारदा मध्ये शिवसेना आमदारांच्या भेटीला पोहचले होते. सध्या सार्या आमदारांची मुंबईत सोय करण्यात आली आहे.
Mumbai: Shiv Sena leader Aditya Thackeray leaves from Hotel Rangsharda after meeting the party MLAs staying there. https://t.co/iYISCx0Von pic.twitter.com/uUVaHl1RHg
— ANI (@ANI) November 7, 2019
03महाराष्ट्रात सत्ता संघर्ष शिगेला पोहचलेला असताना आज नितीन गडकरी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. आज सकाळी अटल बिहारी वाजपेयी यांची कविता ट्वीट केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली आहे. आज संजय राऊत यांनी भाजप- शिवसेना मध्ये कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नसल्याच म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना पक्ष समान सत्ता वाटपावर आग्रही असून अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळावं ही मागणी रेटून धरत आहे. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणं हे महाराष्ट्रासाठी अन्यायकारक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र कधीच कोणासमोर झुकणार नाही. शरद पवार यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरेही कोणाही समोर झुकणार नाहीत असेदेखील त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ अवघ्या काही तासांमध्ये संपणार आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 9 नोव्हेंबर पर्यंत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यपाल यांच्याकडे 'हे' पर्याय
संजय राऊत ट्वीट
आग्नेय परीक्षा की
इस घड़ी में-
आइए, अर्जुन की तरह
उद्घोष करें :
‘‘न दैन्यं न पलायनम्।’’
- अटल बिहारी वाजपेयी
(गीता का संदेश- *न दैन्यं न पलायनम्* अर्थात कोई दीनता नहीं चाहिए , चुनौतियों से भागना नहीं , बल्कि जूझना जरूरी है)
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 8, 2019
सध्या शिवसेनेचे सारे आमदार वांद्रे येथील रंगशारदा सभागृहामध्ये एकत्र जमले आहेत. आज भाजपा सह राज्यातील सार्याच पक्षांमध्ये महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडणार आहेत.
संबंधित बातम्या