Juhu beach clean-up drive in Mumbai: दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर मुंबईच्या जुहू बीच क्लिनअप मध्ये आज Amruta Fadnavis, Shrikant Shinde सह सेलिब्रिटींची हजेरी (Watch Video)
जुहू बीच वर आज सकाळी विशेष स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता.
दहा दिवसांचा गणेशोत्सव आणि त्या पाठोपाठ यंदा गांधी जयंतीच्या अनुषंगाने 'स्वच्छता ही सेवा' उपक्रमाची घोषणा करण्यात आल्याने आज जुहू बीच वर विशेष स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. त्यांना अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची देखिल साथ मिळाली होती. मनुश्री छिल्लर, राजकुमार राव आदींनी आज जुहू बीच वर स्वच्छता मोहिमेत हातभार लावलेला दिसला आहे.
सेलिब्रिटींसोबतच प्रशासकीय सेवेत असलेल्या मुंबई महानगरपालिका आयुक्त Iqbal Singh Chahal, मुंबई पोलिस कमिशनर Vivek Phansalkar यांचाही सहभाग दिसून आला आहे. सध्या 'स्वच्छता ही सेवा' हा उपक्रम देशभर सुरू आहे. यामध्ये 1 ऑक्टोबरला एक तास श्रमदान केले जाणार आहे. त्या अनुषंगाने मुंबई मध्ये रविवारी 1 ऑक्टोबरला 168 ठिकाणी स्वच्छता मोहिम, श्रमदानांतर्गत चालवली जाणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिका आयुक्त चहल यांनी दिली आहे.
जूहू बीच क्लिन अप
सेलिब्रीटींचा सहभाग
#WATCH | Brihanmumbai Municipal Corporation (BMC) Commissioner Iqbal Singh Chahal, Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar and Bollywood actors Raj Kummar Rao and Manushi Chhillar take part in Juhu beach clean-up drive in Mumbai pic.twitter.com/7UqaicfX69
— ANI (@ANI) September 29, 2023
खासदार श्रीकांत शिंदे
On clean-up drive at Mumbai's Juhu Beach, Member of Parliament Dr Shrikant Eknath Shinde says, "This initiative was taken by Amruta Fadnavis, and I thank her for it. The whole of Mumbai together celebrated Ganesh Utsav, and now everyone has come together for this beach… pic.twitter.com/7LRyo4G4gi
— ANI (@ANI) September 29, 2023
इक्बाल सिंह चहल
Brihanmumbai Municipal Corporation (BMC) Commissioner Iqbal Singh Chahal says, " On 1st Oct, we are conducting cleanliness drives at 168 locations in Mumbai...We are setting up seven Sewage Treatment Plants at the cost of Rs 25,000 crore in Mumbai. this way we will be able to… pic.twitter.com/UsI4eLtgDD
— ANI (@ANI) September 29, 2023
मुंबई मध्ये आता समुद्रात केमिकल फ्री पाणी सोडलं जाईल तसेच 7 Sewage Treatment Plants द्वारे पाणी स्वच्छ केले जाईल त्याचबरोबर याचा फायदा समुद्रातील जलजीवन सुरक्षित ठेवण्यासाठीही होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अमृता फडणवीस यांनीही आपण सण-समारंभ साजरे करताना आपली पृथ्वी एकच आहे आणि ती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारीही आपली असल्याचं म्हटलं आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 29, 2023 10:15 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

