Anil Deshmukh Advocate Arrest: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वकीलाला सीबीआयकडून अटक, 'या' कारणामुळे घेतले ताब्यात
अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे वकील आनंद डागा (Lawyer Anand Daga) यांना मुंबईत (Mumbai) सीबीआयने (CBI) अटक केली आहे. त्यांना उपनिरीक्षकाच्या (Sub-inspector) माध्यमातून महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्याविरुद्धच्या (Former Home Minister) तपासावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अटक केली आहे
अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे वकील आनंद डागा (Lawyer Anand Daga) यांना मुंबईत (Mumbai) सीबीआयने (CBI) अटक केली आहे. त्यांना उपनिरीक्षकाच्या (Sub-inspector) माध्यमातून महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्याविरुद्धच्या (Former Home Minister) तपासावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अटक केली आहे. आनंदला अधिक चौकशीसाठी दिल्लीला आणले जाईल. सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी (Abhishek Tiwari) यांनाही काल रात्री अटक करण्यात आली. सीबीआयने त्यांच्या दिल्ली आणि अलाहाबाद येथील जागांवरही छापे टाकले आहेत. यापूर्वी अनिल देशमुख यांचे जावई डॉ गौरव चतुर्वेदी आणि अनिल देशमुख यांच्या कायदेशीर संघाचे सदस्य वकील आनंद डागा यांना सीबीआयने ताब्यात घेतले होते.
गौरव चतुर्वेदी (Gaurav Chaturvedi) यांची सीबीआयने सुटका केली. तत्पूर्वी सीबीआयने त्यांची 20 मिनिटे चौकशी केली. जाण्यापूर्वी सांगितले गेले की गरज पडल्यास पुन्हा प्रश्न विचारले जातील. वकील आनंद डागा यांच्यावर सीबीआयच्या एका खालच्या अधिकाऱ्याला लाच दिल्याचा आणि तपास अहवालांमध्ये फेरफार करण्यात आणि त्यांना लीक केल्याचा आरोप आहे. हेही वाचा Covid-19 Restrictions: मुंबई मध्ये तुर्तास कडक निर्बंध नाहीत- पालकमंत्री अस्लम शेख
अनिल देशमुख यांच्या कायदेशीर संघाशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना सीबीआयने अटक केली आहे. त्याचे नाव अभिषेक तिवारी असे सांगितले जात आहे. परंतु देशमुख यांच्या कुटुंबीयांनी डॉ.चतुर्वेदी यांच्यावर अपहरणाचा आरोप केला आहे. डॉ.चतुर्वेदी आणि त्यांचे वकील आनंद डागा यांना कोणतीही माहिती न देता ताब्यात घेण्यात आल्याचा देशमुख कुटुंबीयांचा आरोप आहे.
देशमुख यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, अशा तपास आणि चौकशीसाठी प्रथम नोटीस दिली जाते. परंतु सीबीआयने अशी कोणतीही नोटीस दिलेली नाही. तत्पूर्वी, अनिल देशमुख यांची सून राहत देशमुख यांनी आरोप केला होता की साध्या गणवेशातील 8 ते 10 लोक त्यांच्या वरळी घराखाली पांढऱ्या इनोव्हा कारमध्ये आले. डॉ.चतुर्वेदी यांना त्यांच्यासोबत कारमध्ये नेले. ते कुठे गेले याबद्दल कोणतीही माहिती नाही. त्याचा फोन सुद्धा वाजत नव्हता. कारण त्यांना सोबत घेण्यापूर्वी त्यांनी डॉ.चतुर्वेदी यांचा मोबाईल फोनही जप्त केला.
राहत देशमुख यांनी असेही सांगितले की, ते आणि त्यांचे कुटुंब डॉ.चतुर्वेदी यांना इकडे-तिकडे शोधत होते. त्यापूर्वी डॉ. गौरव चतुर्वेदी यांना सीबीआय अधिकाऱ्यांनी 20-22 मिनिटांच्या चौकशीनंतर सोडले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी तिने वरळी पोलीस स्टेशन गाठले होते.
(The above story first appeared on LatestLY on Sep 02, 2021 11:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

