Devendra Fadnavis On Maharashtra Violence: महाराष्ट्र हिसांचारातील दोषींना शिक्षा न झाल्यास भाजप जेलभरो आंदोलन करणार, देवेंद्र फडणवीसांचा इशारा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने रझा अकादमीवर बंदी घालावी, अशी आम्ही मागणी केली. या सरकारमध्ये हिम्मत आहे का? तुम्ही आमच्या एका नेत्याचा रझा अकादमीच्या लोकांसोबतचा फोटो दाखवला. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांसह रझा अकादमीच्या लोकांची छायाचित्रे आहेत. रझा अकादमीशी संबंधित कोण आहे हे सर्वांना माहीत आहे?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज अमरावती (Amravati) दौऱ्यावर आहेत. हिंसाचारामुळे (Maharashtra violence) प्रभावित झालेल्या भागांना भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांजवळ संवाद साधला. ते म्हणाले, अमरावतीत जे घडले ते दुर्दैवी आहे. मात्र 13 तारखेला जे घडले ते कृतीची प्रतिक्रिया होती. ही केवळ एक घटना म्हणून दाखवले जात आहे, जे चुकीचे आहे. 12 रोजी काढण्यात आलेला मोर्चा चुकीचा होता. जी घटना त्रिपुरात (Tripura Violence) घडली नाही, त्याचे मीम्स बनवून सोशल मीडियावर पसरवले गेले. जी मशीद जळताना दाखवण्यात आली ती मशीद नव्हती, ती माकपचे कार्यालय होते. कुराण जाळल्याच्या खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या. 12 रोजी दंगल झाली. ही एक नियोजित दंगल होती.
फेक न्यूजच्या आधारे मोर्चे कसे सुरू झाले? त्याची चौकशी झाली पाहिजे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार मतांचे राजकारण करत एकतर्फी कारवाई करत आहे. विशिष्ट समाजाला लक्ष्य केले जात आहे. हिंसाचारात विशिष्ट समाजातील लोकांच्या दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. यानंतर आम्ही 13 रोजी बंदची हाक दिली. हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. तर 13 च्या हिंसाचारात सहभागी नसलेल्यांनाही लक्ष्य करण्यात आले.
त्रिपुरा येथे जी घटना घडली नाही, त्यावर १२ तारखेचा मोर्चा निघाला.
हे मोर्चे मोठ्या षडयंत्राचा भाग होता. मात्र जणू १२ तारखेला काही घडलेच नाही, असे सांगण्याचा राज्य सरकार आणि पोलिसांचा प्रयत्न आहे. संपूर्ण पोलिस यंत्रणा प्रचंड दबावात काम करते आहे: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) November 21, 2021
12 रोजी मोर्चाला परवानगी दिल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला. ते म्हणाले, या दंगलीमुळे एका विशिष्ट धर्माची दुकाने जाळण्यात आली. भाजपने 13 रोजी अमरावती बंदची घोषणा केली होती, ती आम्ही स्वीकारत आहोत. 12 रोजी पोलिस संरक्षणात अनेकांचे बळी जात असतील तर आम्ही गप्प बसणार नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनाला गेलेल्या लोकांची यादी मागवून गुन्हा दाखल करण्यात येत आहे. हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित लोकांवर कारवाई केली जात आहे कारण ते एका विचारसरणीशी संबंधित आहेत. हेही वाचा Aurangabad: लसीकरण वाढवण्यासाठी सरपंचावर मोठी जबाबदारी, 100 टक्के लसीकरण झालेल्या पहिल्या 25 गावांना देणार निधी
ते म्हणाले, जे दोषी असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. यासाठी आम्ही पोलिसांना मदत करण्यास तयार आहोत. मात्र पोलीस राजकीय दबावाखाली एकतर्फी कारवाई करत आहेत. राज्य सरकारलाही तेच हवे असेल तर आम्हीही त्यासाठी तयार आहोत. त्याविरोधात भाजप आता जेलभरो आंदोलन करणार आहे. मी गृहमंत्र्यांना एकतर्फी दबाव आणून वागू नये असे सांगेन.
एका घटनेसाठी चार-चार पोलिस ठाण्यात कारवाई!
ज्यांचा काही संबंध नाही, त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जात आहे.
जर खोट्या गुन्ह्यात अडकवायचे असेल तर आमचे सारे कार्यकर्ते एकत्र जेलभरो आंदोलन करतील: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) November 21, 2021
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने रझा अकादमीवर बंदी घालावी, अशी आम्ही मागणी केली. या सरकारमध्ये हिम्मत आहे का? तुम्ही आमच्या एका नेत्याचा रझा अकादमीच्या लोकांसोबतचा फोटो दाखवला. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांसह रझा अकादमीच्या लोकांची छायाचित्रे आहेत. रझा अकादमीशी संबंधित कोण आहे हे सर्वांना माहीत आहे?
(The above story first appeared on LatestLY on Nov 21, 2021 04:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

