भाजप सत्तेत आल्यापासून मराठी भाषिक लोकांवर हल्ले वाढले, कल्याण ही सुरुवात आहे; Sanjay Raut यांचे खळबळजनक वक्तव्य
मराठी भाषिक लोकांना (Marathi-speaking People) मुंबई आणि शेजारच्या भागातून हाकलण्यासाठी वातावरण तयार केले जात असल्याचा आरोप शिवसेना यूबीटी नेते संजय राऊत (UBT Leader Sanjay Raut) यांनी शुक्रवारी केला. पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील घटनेवर प्रकाश टाकला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Polls) भाजपने विजय मिळवल्यानंतर मराठी भाषिक लोकांवर हल्ले वाढले आहेत. मराठी भाषिक लोकांना (Marathi-speaking People) मुंबई आणि शेजारच्या भागातून हाकलण्यासाठी वातावरण तयार केले जात असल्याचा आरोप शिवसेना यूबीटी नेते संजय राऊत (UBT Leader Sanjay Raut) यांनी शुक्रवारी केला. पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील घटनेवर प्रकाश टाकला. जिथे अमराठी भाषिक लोकांनी एका मराठी भाषिक कुटुंबावर कथित हल्ला केला.
भाजपने शिवसेनेत फूट पाडली - संजय राऊत
माध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, मराठी माणसांवर हल्ला करण्याचा कट रचला जात आहे. कल्याण ही सुरुवात होती. तथापी, संजय राऊत यांनी यावेळी दावा केला की, भाजपने शिवसेनेत फूट पाडली. शिवसेना ही मराठी माणसांची संघटना आहे. त्यामळे भाजपने शिवसेना कमकुवत केली आहे, जेणेकरून स्थानिकांना द्वितीय श्रेणीतील नागरिकांसारखे वागवले जाईल. (हेही वाचा -Kalyan Marathi Family: मराठी माणसाचा सन्मान कायम राखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जाईल: अजित पवार)
मराठी माणसांना मुंबईतून हाकलून देण्याचा प्रयत्न -
राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर मराठी माणसांवरील हल्ले वाढले आहेत. मराठी माणसांना मुंबईतून हाकलून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मराठी माणूस ठाणे आणि कल्याणमध्ये राहू नये, असे वातावरण निर्माण केले जात आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. तथापी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत राऊत म्हणाले की, स्वतःला शिवसेना म्हणवून घेणारे, जे सरकारचा भाग आहेत, ते नालायक आहेत आणि त्यांना कल्याणच्या घटनेची पर्वा नाही. ते सत्तेसाठी हताश आहेत. भाजपची भूमिका मराठी माणसांना नष्ट करण्याची असल्याचा आरोपही यावेळी राऊत यांनी केला. (हेही वाचा, Akhilesh Shukla Suspended: मराठी कुटुंबावर हल्ला करणारा अखिलेश शुक्ला निलंबित; ‘महाराष्ट्र मराठी जनतेचा’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून घटनेचा निषेध (Video))
मुख्यमंत्र्यांनी आजूबाजूच्या भ्रष्ट लोकांवर लक्ष केंद्रित करावे - संजय राऊत
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत आरोप केला की, महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार आणि केंद्रातील मनमोहन सिंग सरकारने शहरी नक्षलवाद्यांच्या आघाडीच्या संघटना म्हणून घोषित केलेल्या काही संघटना भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नये आणि अभिनेता अमोल पालेकर, सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील यात्रेत सहभागी झालेल्या सैन्यात सेवा करणारे दिग्गज हे नक्षलवादी होते का? असा सवाल त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या आजूबाजूच्या भ्रष्ट लोकांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा टोलाही यावेळी राऊत यांनी लगावला.
दरम्यान, डॉ. बीआर आंबेडकर यांच्या कथित अपमानावरून संसदेच्या आवारात विरोधी पक्ष आणि एनडीएच्या खासदारांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेवर बोलताना राऊत म्हणाले की, माजी मंत्री प्रतापचंद्र सारंगी आणि मुकेश राजपूत यांना अभिनयासाठी बक्षीस मिळायला हवे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

