Rahul Gandhi On Modi Govt: राहुल गांधी म्हणाले - मोदी सरकारला दोन भारत बनवायचे आहेत, आम्ही जोडतो, ते विभाजित करतात

नरेंद्र मोदी सरकारला (Modi Govt) देशात दोन भारत बनवायचे आहे. एक उद्योगपतींचा आणि दुसरा गरीब, दलित, मागासवर्गीयांचा. आम्हाला दोन भारत नको आहे, एक भारत हवा आहे. भारतातील प्रत्येक व्यक्तीला त्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली पाहिजे.

Rahul Gandhi On Modi Govt: राहुल गांधी म्हणाले - मोदी सरकारला दोन भारत बनवायचे आहेत, आम्ही जोडतो, ते विभाजित करतात
Rahul Gandhi | (Photo Credit : Facebook)

काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बेनेश्वर धाम येथे 132 कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या तलावाची पायाभरणी केली. यादरम्यान त्यांनी बांसवाडा येथे एका जाहीर सभेलाही संबोधित केले. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारला (Modi Govt) देशात दोन भारत बनवायचे आहे. एक उद्योगपतींचा आणि दुसरा गरीब, दलित, मागासवर्गीयांचा. आम्हाला दोन भारत नको आहे, एक भारत हवा आहे. भारतातील प्रत्येक व्यक्तीला त्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली पाहिजे. उदयपूरमध्ये काँग्रेसच्या नव संकल्प शिबिरात हजेरी लावल्यानंतर राहुल गांधी राजस्थानमधील (Rajasthan) डुंगरपूर येथील बनेश्वर धाम येथे प्रार्थना करत आहेत. यानंतर जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेस आणि आदिवासींचे जवळचे नाते असल्याचा दावा केला. आम्ही तुमच्या इतिहासाचे रक्षण करतो. आम्हाला तुमचा इतिहास दडपायचा नाही किंवा पुसायचा नाही. यूपीए सरकार असताना आम्ही पेसा कायदा आदिवासींच्या जमिनी, जंगल आणि पाण्याच्या संरक्षणासाठी आणला होता. भूसंपादन विधेयकासारखे कायदे करून तुमच्या संपत्तीचे संरक्षण केले आणि आदिवासींना त्याचा फायदा करून दिला.

सर्वांचे रक्षण ही काँग्रेसची विचारधारा

राहुल गांधी म्हणाले की, सध्या देशात दोन विचारधारांची लढाई सुरू आहे. एकप्रकारे काँग्रेसची विचारधारा आहे, जी सर्वांचे रक्षण करते. दुसरीकडे भाजपची विचारधारा आहे जी आदिवासींना दडपून टाकण्याचे काम करते. आम्ही एकत्र येण्याचे काम करतो, ते दुभंगण्याचे काम करतात. आम्ही दुर्बलांना मदत करतो, ते निवडक उद्योगपतींना मदत करतात. आज भारतात रोजगार नाही, महागाई वाढत आहे. राजस्थान सरकार गरीब आणि आदिवासींसाठी काम करत आहे याचा मला आनंद आहे. (हे देखील वाचा: काँग्रेस 2 ऑक्टोबरपासून सुरु करणार काश्मीर ते कन्याकुमारी भारत जोडो यात्रा; Sonia Gandhi यांची घोषणा)

इंग्रजी माध्यमाच्या शाळांना फायदा होईल

राहुल गांधी म्हणाले की, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत राज्यात इंग्रजी माध्यमाची शाळा उघडत आहेत. आदिवासींना इंग्रजीचा खूप फायदा होईल. इंग्रजीमुळे त्यांना कुठेही नोकरी मिळू शकते. भाजप सरकारने अर्थव्यवस्थेवर हल्ला चढवला आहे. पीएम मोदींनी नोटाबंदी केली, चुकीचा जीएसटी लागू केला. यामुळे आपली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. आज देशातील तरुणांना रोजगार मिळू शकत नाही. या सरकारने शेतकऱ्यांवर काळे कायदे आणले. या कायद्याचा फायदा फक्त 2-3 व्यावसायिकांना झाला असता.

(The above story first appeared on LatestLY on May 16, 2022 04:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).