Rahul Gandhi Tweet: प्रचार आणि खोटेपणा हा भाजप-आरएसएसचा पाया, राहुल गांधींची बोचरी टीका
Rahul Gandhi | (Pic Credit - ANI)

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा भाजप (BJP) आणि आरएसएसला (RSS) आपल्या निशाण्यावर घेतले आहे. केरळमध्ये तीन दिवसांच्या मुक्कामावर गेलेल्या राहुल गांधींनी ट्विट करत भाजप आणि आरएसएसवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी शनिवारी दुपारी ट्विट करून म्हटले की, प्रचार आणि खोटेपणा हा भाजप-आरएसएसचा पाया आहे. त्याचवेळी, द्वेषाच्या आगीत देशाला हादरवून सोडणाऱ्या भाजप-आरएसएसचा इतिहास संपूर्ण भारताला माहीत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, देशद्रोही कितीही तोडण्याचे काम करत असले तरी काँग्रेस भारताला जोडण्याचे काम करत राहील.

दरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी केरळ दौऱ्यावर आहेत. त्यांनी त्यांच्या संसदीय मतदारसंघ वायनाडला भेट दिली. यावेळी राहुल गांधी यांनी मनरेगाबाबत पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. शनिवारी वायनाडमध्ये मनरेगा कामगारांना संबोधित करताना ते म्हणाले की यूपीए सरकारने मनरेगा लागू केला आणि विकसित केला. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी लोकसभेत यूपीएचे अपयश म्हटले होते. हेही वाचा Maharashtra Government Formation: Devendra Fadnavis यांना माहित होता BJP चा डाव; केवळ पंतप्रधान मोदींच्या सांगण्यावरून घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा या योजनेचा पहिल्यांदा उल्लेख करण्यात आला तेव्हा खूप विरोध झाला होता. अनेकांनी याला पैशाची उधळपट्टी म्हटले.  पंतप्रधान लोकसभेत मनरेगाच्या विरोधात बोलताना ऐकले तेव्हा मला धक्का बसल्याचे राहुल गांधी म्हणाले. यूपीएच्या अपयशाचे जिवंत स्मारक असे त्यांनी वर्णन केले. तो सरकारी तिजोरीवर बोजा असल्याचे म्हटले. यावरून माझ्या लक्षात आले की पंतप्रधानांना मनरेगाची खोली खरोखरच समजलेली नाही.

हजारो लोक बेरोजगार झाले असताना कोविड महामारीच्या काळात पाहत होते, असेही राहुल गांधी म्हणाले. ज्यामध्ये मनरेगाने लोकांना वाचवले. पंतप्रधान मोदींनी त्यावेळी मनरेगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही कारण हे स्पष्ट झाले की त्यांनी यूपीएच्या अपयशाचे जिवंत स्मारक म्हणून वर्णन केलेल्या कोविडच्या काळात भारताला वाचवले.