ICC CWC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाल्यानंतर पश्चिम बंगाल आणि ओडिशात दोघांची आत्महत्या

अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा सहा विकेट्सने पराभव झाला होता यानंतर देशभरात निराशेची लाट पसरलेली पहायला मिळाले

ICC CWC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाल्यानंतर पश्चिम बंगाल आणि ओडिशात दोघांची आत्महत्या
Suicide | (Photo Credits: unsplash.com)

क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या बांकुरा आणि ओडिशाच्या जाजपूरमध्ये दोन जणांनी आत्महत्या केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा सहा विकेट्सने पराभव झाल्यानंतर राहुल लोहार (23) याने रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास बांकुरा येथील बेलियाटोर पोलीस स्टेशन परिसरात एका सिनेमा हॉलजवळ टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहार यांचे मेहुणे उत्तम सूर यांनी सांगितले की, निकालामुळे मन दुखावले गेले आणि त्याने आपल्या खोलीत गळफास लावून घेतला. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी बांकुरा संमिलानी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पाठवण्यात आला, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (हेही वाचा - Youth Dies Of Shock After fiancée Calls Off Engagement: साखरपुडा मोडल्याच्या धक्क्याने 23 वर्षीय तरूणाचा मृत्यू; कुटुंबाने धरले वधूपक्षाला जबाबदार)

ओडिशाच्या जाजपूरमध्ये, रविवारी रात्री सामना संपल्यानंतर लगेचच बिंझारपूर भागात आणखी एक 23 वर्षीय व्यक्ती त्याच्या घराच्या टेरेसवर लटकलेल्या अवस्थेत आढळून आली, पोलिसांनी सांगितले. मृत देव रंजन दास हे "इमोशनल सिंड्रोम" साठी उपचार घेत होते, असे त्याच्या काकांनी पोलिसांना सांगितले. भारताचा अंतिम सामना हरल्यानंतर तो निराश होऊन घरी निघून गेला, असे कुटुंबातील सदस्याने सांगितले. "आम्ही अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे आणि शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहोत," असे जरी चौकीचे प्रभारी अधिकारी इंद्रमणी जुआंगा यांनी सांगितले.

(The above story first appeared on LatestLY on Nov 21, 2023 02:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).