Jammu Kashmir Terrorist Encounter: दहशतवाद्यांचा कट फसला; 24 तासांत 5 दहशतवादी ठार, 30 किलो IED जप्त

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात आज सकाळी एका संशयित आत्मघातकी गटाने लष्कराच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आणि तीन जवान शहीद झाले.

Jammu Kashmir Terrorist Encounter: दहशतवाद्यांचा कट फसला; 24 तासांत 5 दहशतवादी ठार, 30 किलो IED जप्त
Indian Army (Photo Credits-ANI)

Jammu Kashmir Terrorist Encounter: जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) मध्ये दहशतवादविरोधी कारवाया सुरूच आहेत. गेल्या 24 तासांत, बडगाम आणि राजौरी येथे दोन वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये एकूण पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तसेच 30 किलो IED जप्त करण्यात आला. या वर्षात आतापर्यंत 36 परदेशी दहशतवाद्यांसह 136 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात आज सकाळी एका संशयित आत्मघातकी गटाने लष्कराच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आणि तीन जवान शहीद झाले.

या हल्ल्यात आणखी दोन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजीपी) मुकेश सिंह म्हणाले, "दहशतवाद्यांनी परगलमधील लष्कराच्या छावणीचे कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न केला. जवानांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर चकमक सुरू झाली. यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले आहेत." (हेही वाचा - Banda Boat Accident: उत्तर प्रदेशातील बांदा येथे बोटीचा मोठा अपघात, यमुना नदीत बुडाले 30 जण; दोघांचे मृतदेह सापडले)

बडगाममध्ये तीन दहशतवादी ठार -

याआधी बुधवारी, बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे तीन दहशतवादी मारले गेले. पोलिसांनी सांगितले की, अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी जिल्ह्यातील खानसाहिब भागातील वॉटरहोल येथे घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केल्यानंतर शोध मोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले. चकमकीच्या ठिकाणी वॉन्टेड दहशतवादी लतीफ रादरसह लष्कराच्या तीन दहशतवाद्यांना घेरण्यात आले. दहशतवाद्यांकडून भ्याड साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. लतीफ, राहुल भट आणि अमरीन भट यांच्यासह अनेक नागरिकांच्या हत्येत या दहशतवाद्याचा हात आहे.

राजौरीतील हल्ल्याबाबत एडीजीपी मुकेश सिंह म्हणाले की, सुभेदार राजेंद्र प्रसाद, रायफलमॅन मनोज कुमार आणि रायफलमन लक्ष्मणन डी यांनी ऑपरेशन दरम्यान राजौरी येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना बलिदान दिले आहे.

दारहाळ पोलीस ठाण्यापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या या लष्करी छावणीत अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे. राजौरीचे एसएसपी मोहम्मद अस्लम यांनी सांगितले की, काल रात्री 3.30 वाजता दहशतवाद्यांनी पोस्टवर ग्रेनेड फेकले आणि कॅम्पमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. लष्कराच्या जवानांनी प्रत्युत्तर दिले आणि चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. तर 3 जवानही शहीद झाले.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी राजौरी जिल्ह्यातील सुरक्षा दलांच्या छावणीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आणि दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना योग्यरित्या हाताळण्याचे आवाहन केले. एका ट्विटमध्ये लेफ्टनंट गव्हर्नर म्हणाले की, "राजौरीतील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर जवानांना श्रद्धांजली."

(The above story first appeared on LatestLY on Aug 11, 2022 09:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).