स्वातंत्र दिनाच्या दिवशी शस्रसंधीचे उल्लंघन, भारतीय जवानांकडून 3 पाकिस्तानी जवान ठार
स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) दिवशी पाकिस्तानकडून (Pakistan) शस्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) दिवशी पाकिस्तानकडून (Pakistan) शस्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. याबद्दल एनआयने वृत्त दिले असून पाकिस्तानी जवानांकडून शस्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारतीय जवानांनी याच सडेतोड उत्तर दिले. या गोळीबारात पाकिस्तानचे 3 जवान ठार झाले आहेत. पाकिस्तानने जम्मू-कश्मीरमधील पुंछ येथील केजी सेक्टरमध्ये आज गोळीबार केला. तसेच उरी आणि राजौरी येथे सुद्दा पाकिस्तानने शस्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
गुरुवारी कमांडर लेफ्टिनंट जनरल रणबीर सिंह यांनी असे सांगितले की, पाकिस्तानकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या भारतीय जवानांनी घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानकडून वापरण्यात आलेले सर्व प्रयत्न मोडीस काढले.
Northern Army Commander Lt Gen Ranbir Singh: For the past few days, there have been attempts by Pakistan to push in infiltrators, such infiltration attempts have been supported by ceasefire violations. Indian Army is totally alert & we have been able to foil all such attempts. pic.twitter.com/8Nzs0l4tr0
— ANI (@ANI) August 15, 2019
भारतीय जवानांच्या एका अधिकाऱ्यांनी असे सांगितले होते की, पाकिस्तान गेल्या काही दिवसांपासून सीमारेषेवर दहशतवाद्यांची संख्या वाढवत आहे. तसेच जम्मू-कश्मीर मध्ये या दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पाकिस्तान अशाच मार्गाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्यास त्याचे उत्तर भारतीय जवानांकडून दिले जाईल आणि याचा परिणाम खुप वाईट होईल अशी ताकिद देण्यात आली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 15, 2019 08:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

