Atmanirbharta Saptah: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते 'आत्मनिर्भर भारत' सप्ताहाचे उद्घाटन
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी आत्मनिर्भर भारत साप्ताहची (Atmanirbharta Saptah) सुरुवात केली आहे. सोमवारी, राजनाथ सिंह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राजधानी दिल्लीच्या दक्षिण ब्लॉकमधील
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी आत्मनिर्भर भारत साप्ताहची (Atmanirbharta Saptah) सुरुवात केली आहे. सोमवारी, राजनाथ सिंह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राजधानी दिल्लीच्या दक्षिण ब्लॉकमधील आत्मनिर्भर साप्ताहच्या उद्घाटन सत्रात भाग घेतला. यावेळी राजनाथ सिंहसमवेत अनेक अधिकारी उपस्थित होते. आत्मनिर्भर साप्ताहला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले, 'जर आपण स्वतः भारतात वस्तू तयार करू शकलो तर आपण देशाच्या भांडवलाचा एक मोठा भाग वाचवू शकू. त्या भांडवलाच्या सहाय्याने संरक्षण उद्योगाशी संबंधित सुमारे 7000 एमएसएमईंना प्रोत्साहन दिले जाऊ शकते.'
यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, पंतप्रधानांनी 2017 मध्ये चंपारणच्या शंभरव्या वर्धापन दिनानिमित्त नवीन भारत स्थापनेची घोषणा केली होती. आता पंतप्रधानांनी हे स्पष्ट केले आहे की जेव्हा आपण नवीन भारताचा पाया रचतो, तेव्हा ते आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेने परिपूर्ण असतील. देशांतर्गत संरक्षण उद्योगांना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी, 2024 पर्यंत 101 शस्त्रे आणि सैन्य उपकरणाच्या आयातीवर बंदी जाहीर केली. या उपकरणांमध्ये हलकी लढाऊ हेलिकॉप्टर, मालवाहू विमान, पारंपारिक पाणबुडी आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा समावेश आहे.
If we become capable of manufacturing things within India itself, then we will be able to save a large section of the capital of the country. With the help of that capital, around 7000 MSMEs, associated with Defence Industry, can be encouraged: Defence Minister Rajnath Singh pic.twitter.com/jNeYb5mLWk
— ANI (@ANI) August 10, 2020
संरक्षण मंत्रालयाने संरक्षण खरेदी धोरण तयार केल्याच्या आठवड्यानंतर राजनाथ सिंह यांची घोषणा झाली. मसुद्यात, संरक्षण मंत्रालयाने 2025 पर्यंत संरक्षण उत्पादनात 1.75 लाख कोटी रुपये (25 अब्ज डॉलर्स) उलाढालीचा अंदाज लावला आहे. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने देशांतर्गत व परकीय भांडवली खरेदी साठी 2020-21 मधील भांडवल खरेदी बजेटचे विभाजन केले आहे. चालू आर्थिक वर्षात देशांतर्गत भांडवली खरेदीसाठी सुमारे 52,000 कोटी रुपये खर्च करण्यात येतील. यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प तयार करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 10, 2020 06:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

